Aurangabad Election| सोयगाव नगरपंचायतीनंतर आता ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु

| Updated on: Feb 01, 2022 | 3:00 AM

आगामी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत सध्या निवडणूक विभागाकडून दिले जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार सध्या त्या दिशेने कामाला लागले आहेत. तालुक्यातील तीन गट आणि सहा गणांच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Aurangabad Election| सोयगाव नगरपंचायतीनंतर आता ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील (Aurangabad district) सोयगावमधील नगरपंचायत (Soygaon Nagar panchayat) निवडणुकीनंतर आता तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्या टप्प्याच्या निवडणुकांचे संकेत मिळाले आहेत. 31 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत ग्राम पंचायतींची हद्द निश्चिती, प्रभागनिहाय रचना आणि आरक्षण निश्चिती करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. तालुक्यातील वनगाव, घोरकुंड, वाडीसुतांडा, नायगाव, कंकराळा, रावेरी, सावरखेडा, लेनापूर आणि वरखेडी ठाणा या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता सोयगावात नगरपालिकेनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. सोयगाव नगरपालिकेवर शिवसेनेने (Shiv Sena) दणदणीत विजय मिळवला आहे.

प्रभागरचनेचे काम सुरु

जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक विभागाने प्रभाग रचना व आरक्षण पद्धतीची कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचा दुसरा टप्पा व त्यासोबत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. सोयगाव वगळता तालुक्यात तीन गट आणि सहा गणांसाठी 96 मतदान केंद्रावर 82 हजार 640 मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून नव्याने कार्यक्रम प्राप्त झाल्यास नवीन मतदार वाढू शकतात.

नव्या रचनेवर इच्छुकांचे लक्ष

आगामी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत सध्या निवडणूक विभागाकडून दिले जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार सध्या त्या दिशेने कामाला लागले आहेत. तालुक्यातील तीन गट आणि सहा गणांच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

सोयगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा विजय

औरंगाबाद जिल्ह्यात केवळ सोयगाव नगरपंचायतीसाठी यंदाची निवडणूक झाली. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडली. 21 डिसेंबर आणि 18 जानेवारीला यासाठी मतदान घेण्यात आले. सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायतीवर शिवसेनेचे स्पष्ट बहुमत आले. 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हे पद एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Dombivali Banner : डोंबिवलीतील ‘तो’ मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी, शिवसेनेला केले टिकेचे लक्ष्य

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत