AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, काय घडतंय?

भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र भाजपात बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुरीत शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीमुळे कदम कुटुंब नाराज आहे, तर पाथर्डीत मोनिका राजळे यांच्या उमेदवारीवरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांचा रोष आणि पक्षांतर्गत मतभेद यामुळे भाजपला निवडणुकीत आव्हान निर्माण झाले आहे. करमाळ्यात गणेश चिवटे यांनीही उमेदवारीसाठी फडणवीस यांची भेट घेतली आहे.

उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, काय घडतंय?
महाराष्ट्र भाजप
| Updated on: Oct 21, 2024 | 9:32 PM
Share

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदमांची नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राहुरी विधानसभेसाठी सत्यजित कदम इच्छुक होते. पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांची नाराजी समोर आली आहे. सत्यजित कदम हे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. “कार्यकर्त्यांमुळे मी नेता झालो. त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार. दोन दिवसात निर्णय घेणार”, अशी भूमिका सत्यजित कदम यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पक्षाने सत्यजित कदम यांना तिकीट नाकारल्याने चंद्रशेखर कदम देखील नाराज आहेत. “मागील निवडणुकीत पक्षहितासाठी थांबलो. मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. सत्यजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहणार”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.

शेवगाव पाथर्डीतही नाराजी नाट्य

शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर करताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपकडून मोनिका राजळे यांना उमेदवारी न देता भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांना द्यावी, अशी मागणी करत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल केदार यांनी पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीला सुरुवात झाली आहे. याआधी भाजप जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी उघडपणे राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाथर्डी शेवगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये अंतर्गत कलह होण्याची शक्यता आहे.

करमाळ्याचे गणेश चिवटे यांनी घेतली फडणवीसांची भेट

सोलापुरातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांची सुद्धा गणेश चिवटे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे.

Follow Us
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही.
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक.
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा.
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा.
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.