लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय? वीज परत कधी येणार?

Kalyan Power Cut : कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर या भागात शुक्रवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय? वीज परत कधी येणार?
Kalyan power cut
Image Credit source: Google
| Updated on: Aug 13, 2026 | 10:47 PM

कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या भागासह आसपासच्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. वडोदरा-मुंबई महामार्गाच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या भागात, किती वाजता वीजपुरवठा बंद राहणार ते सविस्तर जाणून घेऊयात.

कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरमध्ये उद्या वीजपुरवठा बंद

वडोदरा-मुंबई महामार्गाच्या कामासाठी शुक्रवारी कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह अनेक भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवे कामासाठी 14 ऑगस्ट रोजी महापारेषणची पडघा-मोहने 100 केव्ही लाइन बंद राहणार असल्याने वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 6 ते 11 वाजेदरम्यान कल्याण मंडळ 1 व 2 अंतर्गत अनेक भागांमध्ये टप्याटप्यानी नियोजित वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली.

वीज पुरवठा कधी बंद राहणार?

टिटवाळा, मांडा, बल्याणी, अंबिवली रोड परिसरात सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. तर खडकपाडा, बारावे, चिकनघर, रामबाग, कर्णिक रोड, पौर्णिमा चौक, रेल्वे हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात 5 तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसणार आहे.

पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होणार

योगीधाम, गौरीपाडा, शहाड, बिरला कॉलेज, इंदिरानगर, म्हाडा कॉलनी, कोकण वसाहत आणि संदीप हॉटेल परिसरातही वीजपुरवठा बंद राहणार. अटाळी, वडवली, अंबिवली, नेपच्युन परिसरासह केडीएमसीच्या बारावे आणि अटाळी पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे काही भागात पाण्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी आवश्यक कामांची खबरदारी घेण्याचे आवाहन

त्याचबरोबर कात्रप, खरवाई, जुवेली, बदलापूर, बापसई, गोवेली तसेच अंबरनाथ रेल्वे स्टेशन, कानसई आणि मोरीवली MIDC परिसरात टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामांचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या कल्याण मंडळ 1 व 2 च्या अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us