
ऐन नवरात्रीत राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्यात अलर्ट जारी केला आहे. आज २३ सप्टेंबर रोजी राज्यातील 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो. तसेच राज्यातील उर्वरित ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभर मुंबईत आकाश थोडे ढगाळ राहील. काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर विशेषत: रायगड आणि रत्नागिरीत मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो.
22/09, 9 pm: Light to moderate intermittent spells over parts of marked areas during next 3,4 hrs at isolated places.
Konkan possibility of light spells with occasional moderate type.
Watch for IMD updates please. pic.twitter.com/iVVLltKqjs— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 22, 2025
त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.