AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाच्या खेळाडूवर वर्ल्ड कप विजयानंतर माफी मागण्याची वेळ, व्हीडिओ व्हायरल

Icc T20i World Cup 2026 Final : न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारताचे खेळाडू आणि चाहते टी 20i वर्ल्ड कप विजयाचा एकच जल्लोष साजरा करत होते. तर दुसऱ्या बाजूला हा खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूची माफी मागत होता.

IND vs NZ : टीम इंडियाच्या खेळाडूवर वर्ल्ड कप विजयानंतर माफी मागण्याची वेळ, व्हीडिओ व्हायरल
Indian Cricket Team T20i World Cup 2026Image Credit source: ICC
| Updated on: Mar 10, 2026 | 1:12 AM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर जबरदस्त असा विजय मिळवून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केल. भारताने अशाप्रकारे हा सामना 96 धावांनी जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूवर ऑन कॅमेरा माफी मागण्याची वेळ आली. या खेळाडूचा माफी मागतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की प्रकरण काय झालं होतं? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप फायनलमधील विजयानंतर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेल याची जाहीर माफी मागितली. अर्शदीपने सामन्यानंतर डॅरेलकडे जाऊन त्याने केलेल्या कृतीबाबत खेद व्यक्त केला. अर्शदीपने दिलगिरी व्यक्त केली. डॅरेलने खिलाडूवृत्ती दाखवत अर्शदीपला मोठ्या मनाने माफ केलं. अर्शदीपने डॅरेलची माफी मागितल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र अर्शदीपने डॅरेलची माफी मागायला नक्की केलं तरी काय होतं? हे जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडची बॅटिंग सुरु होती. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने न्यूझीलंडच्या डावातील 11 वी ओव्हर टाकत होता. अर्शदीपने या ओव्हरमधील पाचवा बॉल टाकला. मिचेलने बॉलला बॅटने स्पर्श केला. अर्शदीपने तो बॉल उचलला आणि मिचेलच्या दिशेने जोरात फेकला. मात्र अर्शदीपचा अंदाज चुकला. मिचेल स्टंपसमोर नसतानाही अर्शदीपने वेगात तो बॉल फेकला. अर्शदीपने फेकलेल्या बॉलचा मिचेलला जोरात फटका बसला. अर्शदीपने हे असं जाणिवपूर्वक केलं नाही. मात्र असं करण्याची गरज नव्हती.

बॉलचा फटका लागल्याने मिचेल संतापला. मिचेलने अर्शदीपच्या पाठीमागे जात त्याने केलेल्या या कृतीबाबत जाब विचारला. मात्र अर्शदीपला आपण चूक केल्याचं जाणवलं. त्यामुळे अर्शदीपकडेही ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. तापलेल्या मिचलेला अंपायरने समजवलं. तसेच अंपायरने अर्शदीपची कानउघडणी केली. तर दुसऱ्या बाजूला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने मिचेलला समजवलं. त्यामुळे विषयाला तिथेच पूर्णविराम मिळाला.

अर्शदीपकडून डॅरेचली माफी

मात्र अर्शदीपला आपण चूकीचं केल्याचt जाणिव झाली. अर्शदीप सामन्यानंतर डॅरेलच्या जवळ गेला. अर्शदीपने त्यानंतर डॅरेलची माफी मागितली. डॅरेलनेही अर्शदीपची चूक मान्य करत दिलदारपणा दाखवत त्याला माफ केलं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.