AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका

… तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका

| Updated on: Mar 09, 2026 | 12:54 PM
Share

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर टीका करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी महाराष्ट्राचा विकास थांबवला असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीच्या भूमिकेवरही टीकास्त्र सोडत, ओम बिर्ला लोकसभेचे कामकाज यशस्वीपणे चालवण्यासाठी सक्षम असल्याचे स्पष्ट केले.

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असे म्हटले आहे की, जगामध्ये भारताची स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चांगली आहे, तर राऊत यांनी स्वतःच्या आणि पक्षाच्या स्थितीचा विचार करावा. भारत अमेरिकेचा गुलाम नाही, उलट राऊत सिल्व्हर ओक आणि सोनिया गांधी-राहुल गांधींचे गुलाम आहेत. शरद पवारांच्या घरी सेवा करणाऱ्यांनी मोदीजींवर टीका करू नये, असंही बन म्हणाले.

पुढे बोलताना नवनाथ बन यांनी म्हंटलं की, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. ते अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत, असा दावा  केला आहे. त्यांच्या काळात विकासाची एकही कामे झाली नाहीत, उलट महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रो थांबवण्याचे पाप केले. त्यामुळे जनतेने त्यांना निवडणुकीत घरी बसवले, अशी टीका केली.

लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी ओम बिर्ला सक्षम आहेत. इंडी आघाडीची परिस्थिती बिघडल्यामुळे ते अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे अस्तित्व संपल्याप्रमाणेच इंडी अलायन्सचेही अस्तित्व संपले आहे. ओम बिर्ला समर्थपणे लोकसभा चालवत असून, राऊत यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही, असाही विश्वास बन यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Mar 09, 2026 12:54 PM
Follow Us