
कांदिवली येथील हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाच्या तटरक्षक भिंतीवर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऑलिम्पिक खेळाडू तसेच विविध खेळातील नामवंत खेळाडूंची भिंतीचित्रे रेखाटण्यात आली आहेत.

आपण शहरातील इतर तटरक्षक भिंतीवर बघितले तर बऱ्याच भिंतीवर रंग देखील व्यवस्थित नसतो. तर काही भिंतींवर जाहिराती लावल्या जातात.

कांदिवली येथील हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाच्या तटरक्षक भिंतीवर खेळाडूंची भिंतीचित्रे रेखाटण्यात आली आहे. यामुळे हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाची शोभा वाढत आहे.

कांदिवली शहरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे काैतुक केले जात आहे. या खेळांडूचे चित्र रेखाटण्याचे काम जयंत सावंत आणि त्यांच्या ओशन आर्ट टीमने केले आहे.

या भिंतींवर धोनीपासून ते ध्यानचंदपर्यंत सर्वांचेच चित्र रेखाटण्यात आली आहेत. या चित्र्यांची खासियत म्हणजे हे सर्वच चित्रे अत्यंत हुबेहुब रेखाटण्यात आली आहेत.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला खेळाडू निरज चोपडा याचे ही चित्र रेखाटण्यात आले आहे.

क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर याचेही चित्र या भिंतीवर रेखाटण्यात आले आहे.