शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुंबईतील शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं. अतिशय उत्साही वातावरणात शिस्तबद्ध सलामीसह हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपालांनी राज्याला उद्देशून भाषण केलं. विद्यासागर राव म्हणाले, “राज्यात 13 टक्के परकीय गुंतवणूक आलेली आहे. उद्योगासाठी चांगलं वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध […]

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं
Follow us on

मुंबई: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुंबईतील शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं. अतिशय उत्साही वातावरणात शिस्तबद्ध सलामीसह हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपालांनी राज्याला उद्देशून भाषण केलं.

विद्यासागर राव म्हणाले, “राज्यात 13 टक्के परकीय गुंतवणूक आलेली आहे. उद्योगासाठी चांगलं वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पीक विमा योजना राबवण्यात सरकारला उत्तम यश मिळालं. सॉईल हेल्थ कार्डनं शेती उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. जलयुक्त शिवारमधून 50 हजार गावांना पाणी मिळालं.”

यावेळी राज्यपालांनी मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केलं. “मराठा समाजाला आरक्षण देऊन, सरकारने मराठा समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला आहे”, असं राज्यपाल म्हणाले.

कुपोषण निर्मूलनासाठी सरकार विविध काम करत आहे. सरकारला कुपोषण रोखण्यात यश आलं आहे. ग्रामीण भागात 30 हजार किमी रस्ते बनवले. नवी मुंबईसह राज्यात 10 विमानतळ बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं.

राज्यपालांचं भाषण राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वाचून दाखवलं.