Sandeep Deshpande : आशिष शेलार यांना रामदास आठवले चावले, त्यांना पक्षात… मनसेच्या संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांना पक्षात कुणीही विचारत नसल्याचा दावा केला. शेलार यांना "मुंबईला लागलेली बुरशी" असे संबोधत त्यांनी रझा अकादमीच्या मोर्चावेळी हिंदुत्ववादी कुठे होते असा सवाल केला. यावर, भूमिका बदलणाऱ्यांनी भाजप नेत्यांवर टीका करू नये अशी प्रतिटीकाही करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेलार यांना सध्या त्यांच्या पक्षात कुणीही विचारत नाही, असा दावा देशपांडे यांनी केला. शेलार यांनी अलीकडेच कवितेच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे यांच्या सेनेवर टीका केली होती, त्याला उत्तर देताना देशपांडे यांनी हे विधान केले. देशपांडे यांनी आशिष शेलार यांना “आशिष कुरेशी” असे संबोधत “मुंबईला लागलेली बुरशी” अशी उपमा दिली.
रझा अकादमीचा मोर्चा निघाला असताना, हुतात्मा चौकात हिंदुत्ववादी नेते कुठे होते, असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. फडणवीस, आशिष कुरेशी किंवा अमित खान यापैकी कुणीही त्यावेळी बाहेर आले नाही, असे त्यांनी म्हटले. या टीकेनंतर, संदीप देशपांडे यांच्यावरही प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यांना विचार नाहीत, आचार नाहीत आणि भूमिकाही नाहीत, अशा देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका करू नये, असे म्हटले गेले.
Published on: Dec 25, 2025 05:59 PM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
