Corona Update : कोरोना रूग्णांची संख्या अशीचं वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा मास्कसक्ती, मंत्रीमंडळातल्या बैठकीत व्यक्त केली चिंता

| Updated on: Apr 21, 2022 | 2:34 PM

कोरोनाने (Corona) पुन्हा डोकेवरती काढल्याने दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत (Mumbai) देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली आहे. मागच्या आठ दिवसाच्या तुलनेत कोरोनाचा आकडा वाढल्याचे पडसाद आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले.

Corona Update : कोरोना रूग्णांची संख्या अशीचं वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा मास्कसक्ती, मंत्रीमंडळातल्या बैठकीत व्यक्त केली चिंता
शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – कोरोनाने (Corona) पुन्हा डोकेवरती काढल्याने दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत (Mumbai) देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली आहे. मागच्या आठ दिवसाच्या तुलनेत कोरोनाचा आकडा वाढल्याचे पडसाद आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले. कोरोना रूग्णांची आकडेवारी पुन्हा वाढली तर पुन्हा मास्कचा वापर करावा लागेल. याबाबत लवकरचं निर्णय घ्यावा लागेल अशी चर्चा मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले. आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये देशात 2380 नवे कोरोना रूग्ण सापडल्याचे आहेत. त्याचबरोबर 13,433 कोरोना रूग्ण सध्या उपचार घेत असल्याचे म्हटले आहे.

मंत्रीमंडळातल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाणीसाठा आणि कोरोनाच्या परिस्थितीचे प्रत्येकवेळी सादरीकरण केले जाते. यावेळी सुध्दा कोरोनाच्या परिस्थितीचे सादरीकरण झाले. मागील आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या कमी होती. या आठवड्यात अधिक असल्याचे सादरीकरणात दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रीमंडळातल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

कोरोनाचा आकडा असाचं वाढत राहिला तर पुन्हा मास्कसक्ती

मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना माहिती दिली. कोरोनाचा आकडा असाचं वाढत राहिला तर पुन्हा मास्कसक्ती करण्यात येईल. कोरोनाची रूग्णंसख्या आटोक्यात आली होती. मागच्या आठवड्यात कोरोनाची रूग्णसंख्या २९ पर्यंत गेली होती. काही दिवसांमध्ये पुन्हा शंभरी गाठली आहे. त्यामुळे मुंबईत चिंता वाढली आहे. काल मुंबईत दिवसभरात नऊ हजार कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यामध्ये 98 रूग्ण सापडले, त्यापैकी 96 रूग्णांना कसलीही लक्षणं नाहीत. तपासणी केलेल्या कोणत्याही रूग्णाला रूग्णालयाची किंवा ऑक्सिजन वेडची गरज नाही.

Sandeep Deshpande on Amol MItkari: मिटकरी म्हणजे मटणकरी, चड्डीत राहायचं काय समजलं?; मनसेची मिटकरींना दमबाजी

Brahman Mahasangh Vs NCP : ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीत पुण्यात राडा! अमोल मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी, राष्ट्रवादीचंही प्रत्त्युत्तर

फोर्डनंतर आणखी एका बजेट कार ब्रँडचे भारतातून पॅकअप; उत्पादन केले बंद, कारण काय?