संजय राऊतांवरी कारवाई चुकीची, शिंदे गटातील नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर…

| Updated on: Nov 15, 2022 | 8:14 PM

संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत संजय राऊत यांची पाठराखण गजानन कीर्तीकर यांनी केली असल्याचे दिसून आले.

संजय राऊतांवरी कारवाई चुकीची, शिंदे गटातील नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर...
Follow us on

मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटांकडून सवाल प्रतिसवाल करण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही सूड बु्द्धीने करण्यात आली होती. असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाने शिंदे गटावर केला होता. ठाकरे गटाचीच री ओढत नुकताच शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तीकर यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

त्यांच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत संजय राऊत पाठराखण गजानन कीर्तीकर यांनी केली असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांची पाठराखण केल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याचेही सांगण्यात येत आहे.

नुकतेच शिंदे गटात सामील झालेले अगोदर ठाकरे गटाचे नेते आणि आता शिंदे गटाचे झालेले गजानन कीर्तीकर यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची पाठराखण केली आहे.

त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर गजानन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा किरकोळ होता असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाने समर्थन केले असले तरी शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकाराचे आरोप केले होते.

त्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत यावर सध्या काही बोलणार नाही असं स्पष्ट सांगितले होते. मात्र शिंदे गटात गेलेल्या गजानन कीर्तीकर यांनी मात्र न्यायालयाने जे म्हटलं आहे तेच बरोबर आहे असं म्हणत त्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.