Mumbai Bandra News : वांद्रेमध्ये दुमजली इमारत कोसळली, एक ठार, 16 जखमी

| Updated on: Jun 09, 2022 | 6:33 AM

Mumbai Building Collapse : याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्यात.

Mumbai Bandra News : वांद्रेमध्ये दुमजली इमारत कोसळली, एक ठार, 16 जखमी
दुर्घटनेत एकाचा मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईतून (Mumbai Breaking News) मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत मध्यरात्री वांद्रे (Bandra Building Collapse) येथे दुमजली इमारत कोसळली. शास्त्री नगर मधील एक दुमजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्यात. बीएमसी (BMC) व पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी होते. या दुर्घटनेत सोळा जण जखमी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी व तसेच पोलीस आयुक्त मंजुनाथ शिगें उपस्थित होते.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये बिहारहून आलेले सर्व मजूर राहत होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर सध्या 16 जण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

आदित्य ठाकरे यांचं ट्वीट :

तातडीने बचावकार्य

काही जण दबले गेल्याची भीती

वांद्रे पश्चिम भागातील शास्त्री नगर भागात असलेली ही इमारत तळमजला अधिक दोन मजले अशी होती. काही जखमींना रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बीएमसीकडून ही माहिती देणात आली. तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली दबले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री 2 वाजता केलेल्या ट्वीटनुसार, या ठिकाणी तत्काळ बचावकार्य करण्यात करण्यास सुरुवात झाली. सध्या जखमींना रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

इमारत कोसळण्याची घटना याधीही वांद्रेमध्ये घडलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा दुमजली इमारत कोसळली असल्याने मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तर इमारतीमधील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. ऐन मान्सूनच्या तोंडावर घडलेल्या या घटनेनं मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आलाय. अशातच पालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यानं यावरुन राजकारणही तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.