वाघासारखं नेतृत्व पिंजऱ्याबाहेर पडलं, एकनाथ खडसे म्हणाले, यामुळे आता… 

शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेचा आता दुसरा टप्पा आहे, त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याची जबाबदारीही खासदार संजय राऊत यांच्याकडे असणार आहे.

वाघासारखं नेतृत्व पिंजऱ्याबाहेर पडलं, एकनाथ खडसे म्हणाले, यामुळे आता... 
| Edited By: | Updated on: Nov 09, 2022 | 8:34 PM

जळगावः उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या सुटकेमुळे आनंद व्यक्त केला असून त्यांच्या येण्यामुळे फायदा होणार असल्याचा दावा अनेक नेते करत आहेत. याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी पिंजऱ्यातून वाघ बाहेर आल्याची भावना व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, शिवसेनेचे आक्रमक व वाघासारखं नेतृत्व हे आता पिंजऱ्याबाहेर पडले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह व चेतना संचारली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत बाहेर पडल्यामुळे शिवसेनेलाच नाही तर महाविकास आघाडीलाही त्याचा फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सामनाच्या माध्यमातूनदेखील त्यांचं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांची सुटका झाल्यामुळे शिवसेनेतील अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेचा आता दुसरा टप्पा आहे, त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याची जबाबदारीही खासदार संजय राऊत यांच्याकडे असणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. संजय राऊत या यात्रेत सहभागी होणार असल्यामुळेही शिवसैनिकामंध्ये संचारला आहे.

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यांच्या सुटकेमुळे आनंद व्यक्त केला आहे.

Follow Us