AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कशाला तोंड उघडायला लावताय?’ शिवसेनेची ऑफर धुडकावणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींवर राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊतांनी आज संभाजीराजेंची उमेदवारी आणि शिवसेनेवर होणाऱ्या विश्वासघाताच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. "आमच्यासाठी राज्यसभा निवडणुकीचा विषय आता संपला आहे. संभाजी राजेंबद्दल आमच्या मनात आजही प्रेम आणि आदर आहे",असं राऊत म्हणाले आहेत.

'कशाला तोंड उघडायला लावताय?' शिवसेनेची ऑफर धुडकावणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींवर राऊतांचा हल्लाबोल
| Updated on: May 28, 2022 | 12:12 PM
Share

मुंबई : छत्रपती संभाजी राजेंना (Cambhajiraje Chhatrapati) शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची उघड चर्चा होती. पण शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर काल संभाजी राजे यांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवली. शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही, असा थेट आरोप केला. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यावर शिवसेनेची भूमिका मांडली. त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ‘कशाला तोंड उघडायला लावताय?’, असं म्हटलं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत, तर ते संपर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. आमच्यासाठी राज्यसभा निवडणुकीचा विषय आता संपला आहे. आम्ही संजय पवारांना उमेदवारी दिली आहे , असं संजय राऊत म्हणालेत.

“राजेंबद्दल आजही आदर, पण”

संजय राऊतांनी आज संभाजीराजेंची उमेदवारी आणि शिवसेनेवर होणाऱ्या विश्वासघाताच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. “आमच्यासाठी राज्यसभा निवडणुकीचा विषय आता संपला आहे. संभाजी राजेंबद्दल आमच्या मनात आजही प्रेम आणि आदर आहे. पण आम्ही संजय पवारांना उमेदवारी दिली आहे. संभाजी राजेंनेही त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता हा विषय नको”, असं म्हणत राजेंच्या शिवनसेना पुरस्कृत उमेदवारीला पक्षाच्या वतीने पूर्णविराम दिला आहे.

“चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का?”

जुनी आठवण करून देत भाजपच्या वतीने शिवसेनेवर गद्दारीचा टॅग लावला जात आहे. त्यावरही राऊत बोलते झाले. “चंद्रकांत पाटील एवढ्या अधिकारीवाणीने का बोलत आहेत, ते काय शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का?”, असा थेट सवाल राऊतांनी विचारला.

“सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेवर पाठवायचं ठरवलं आहे. पक्षासाठी, सामान्य जनतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकांचं प्रतिनिधीत्व करता यावं, यासाठी संजय पवारांची निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचा आम्हा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.