AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 काही लोकं मन की बात ऐकवितात, आम्ही मात्र… शशी थरूर यांचं म्हणणं काय?

पार्टीमध्ये काही बदल हवे. त्यासाठी मी उभा झालो आहे.

 काही लोकं मन की बात ऐकवितात, आम्ही मात्र... शशी थरूर यांचं म्हणणं काय?
शशी थरूर यांचं म्हणणं काय? Image Credit source: social media
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 02, 2022 | 9:32 PM
Share

सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे निवडणुकीतील उमेदवार असलेले शशी थरूर यांनी नागपुरात आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, या निवडणुकीमुळे दुसरे पक्ष आमच्या पक्षाकडे बघायला लागले की ही पार्टी लोकशाहीची आहे. कार्यकर्ता ठरवेल की पार्टीचं भविष्य कोणाच्या हातात असेल. मी अपेक्षा करतो की पार्टीमध्ये बदल झाला पाहिजे. त्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभा झालो.

कॉंग्रेस जीवंत ठेवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला. आम्हाला त्या लोकांना वापस आणायचं आहे जे आमच्या सोबत होते. मात्र काही काळापासून दुसऱ्या पक्षात गेले. आम्हाला पार्टीत कार्यकर्त्याला शक्तिशाली बनवायचं आहे.

पक्षात काही बदल हवेत

आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. कारण सगळे भारताचे नागरिक आहेत, असंही थरूर यांनी सांगितलं. मल्लिकार्जुन खर्गे आणि मी उमेदवार आहोत. आम्ही दोघे शत्रू नाही एकाच पार्टीचे आहोत.

पार्टीमध्ये काही बदल हवे. त्यासाठी मी उभं झालो आहे. खर्गे पार्टीचे मोठे नेते आहेत. त्यांचा सन्मान आहे. काँग्रेस पार्टीच्या टॉप 3 मध्ये खर्गे आहेत, असंही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडे लोक अपेक्षेने पाहत आहेत. लोकांना काँग्रेस पाहिजे आहे.

काँग्रेस युवकांची असली पाहिजे

नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात जे जाळ विणला ते आता लोकांना नको आहे. काही लोक मन की बात ऐकवितात. आम्ही जन की बात ऐकतो, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर थरूर यांनी निशाणा साधला.

जिल्हा अध्यक्ष बनवायचा असेल तर काँग्रेस अध्यक्ष यांची सही लागते. सगळ्या गोष्टी काँग्रेस अध्यक्ष ठरविणार हे आता थांबायला पाहिजे, अशी काँग्रेस मला अपेक्षित आहे. काँग्रेस ही युवकांची असली पाहिजे. कारण हा देश युवा स्थितीत आहे, असंही यावेळी थरूर यांनी सांगितलं.

Follow Us
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?