नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला

| Updated on: Sep 08, 2021 | 5:15 PM

पाठ फिरवलेल्या पावसाने अखेर मनावर घेत नाशिकजवळच्या (Nashik) नांदगाव, मनमाडमध्ये (Nandgaon, Manmad) दुपारपासून जोरदार (Heavy rains) हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे, तर तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे.

नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला
लेंडी, शांकभरीला पूर.
Follow us on

नाशिकः पाठ फिरवलेल्या पावसाने अखेर मनावर घेत नाशिकजवळच्या (Nashik) नांदगाव, मनमाडमध्ये (Nandgaon, Manmad) दुपारपासून जोरदार (Heavy rains) हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे, तर तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे.  (Heavy rains in Nandgaon, Manmad; rivers flooded, lakes burst)

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुण राजाची कृपादृष्टी झाली आहे. दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. नांदगाव आणि मनमाडला परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काल दुपारपासून आतापर्यंत तब्बल 123 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझडही झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे. पिकांचे नुकसान झाले असून, सध्या तरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाला नगराध्यक्ष बबी कवडे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पुढील काही काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मनमाडला तासात 21 मिमी

मनमाड शहराला मंगळवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. एका तासात सुमारे 21 मिमी पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना फायदा होणार आहे.

पावसाचा इशारा

दरम्यान, नाशकात आजही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्या दक्षिण छत्तीसगढ आणि आसपासच्या परिसरात चक्रीय चक्रवात स्थिती आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस होत आहे. राज्यात आठ आणि नऊ सप्टेंबर हे दोन दिवस जोरदार पावसाचे सांगण्यात आले आहेत. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला अतिवृष्टीचा हाय ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसामुळे अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्यातरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
– प्रदीप पाटील, तहसीलदार, नांदगाव (Heavy rains in Nandgaon, Manmad; rivers flooded, lakes burst)

इतर बातम्याः

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!