Navneet Rana : नवनीत राणांना ईडीची नोटीस देऊन शाह, मोदींनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला, मंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आता मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला, असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

Navneet Rana : नवनीत राणांना ईडीची नोटीस देऊन शाह, मोदींनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला, मंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
नवनीत राणांना ईडीची नोटीस देऊन शाह, मोदींनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला, मंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2022 | 3:31 PM

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) वाद सुरू आहे. त्यातल्या त्यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांची मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा, त्यानंतर झालेला वाद, आणि अटकही बरीच चर्चेत राहिली. त्यातच गुरूवारी नवनीत राणांना हनुमान चालीसा म्हणून दाखवा म्हणाऱ्या तरुणाची ऑडिओ क्लिपही बरीच व्हायरल झाली. तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या हट्टावरून राज ठाकरे यांनीही जोरदार निशाणा साधला, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करायला ती काय मशीद आहे का? असा सवला त्यांनी पुण्यातून केला. मात्र आता मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला, असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

मोदी, शाह यांनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला

याबाबत बोलताना मंत्री बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणा यांना ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना हनुमान चालीसाचा पठणाचा कार्यक्रम दिला, म्हणून नवनीत राणा यांच्यावरचं ईडीचं संकट टळलं, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला. तसेच याच कारणामुळे नवनीत राणा यांच्या पोस्टरवर मोदी आणि शाह यांचे फोटो झळकले असावेत, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राणा यांना तुरूंगात मारहाण झाली नाही याबाबत त्यांनी आभार मानले पाहिजेत असेही विधान बच्चू कडू यांनीच केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रााणा दाम्पत्य याच हनुमान चालीसा पठणावरून शिवसेनेच्याही टार्गेटवर आहे.

हनुमान चालीसा पठणाचा वाद दिल्लीपर्यंत

महाराष्ट्रात सुरू झालेला हनुमान चालीसा पठणाचा हा राजकीय वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. कारण आपल्याला जेलमध्ये योग्य वागणूक मिळाला नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला. तसेच त्यांच्या आरोग्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर भाजप नेत्यांनीही यावरून महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उडवली. मात्र अजूनही हा वाद संपलेला नाही. अलिकडेच केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात कारवाईचा धडका लावला असताना, आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरूनच आरोप प्रत्यारोप सुरू असताना, मंत्री बच्चू कडू यांनी केलेलं हे विधान आता चांगलेच चर्चेत आले आहे.