तुमच्या गाड्यांनाही काचा आहेत हे लक्षात ठेवा…कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात लक्षात असूद्या… स्वराज्य संघटना आक्रमक
कर्नाटक बँकेच्या बाहेर असलेल्या फलकांना काळे फासण्यात आले आहे. त्यामध्ये भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असा उल्लेख करत कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचे पडसात आता नाशिकमध्ये पडू लागले आहे. नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या वतिने कर्नाटक बँकेच्या बाहेरील फलकांवर काळे फासण्यात आले आहे. स्वराज्य संघटनेने बँकेच्या बाहेर भगव्या रंगात जय महाराष्ट्र असे देखील लिहिण्यात आले आहे. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून नाशिकमध्ये स्वराज संघटना आक्रमक झाली होती. महाराष्ट्रातील अनेक नागरिक आणि भक्त हे कर्नाटकमध्ये जात असतात, त्यांना त्रास देऊन नका अन्यथा तुमचीही लोकं महाराष्ट्रात राहतात तुमच्याही गाड्यांना काचा आहेत, हे ध्यानात ठेवा असा इशाराच कर्नाटक सरकारला स्वराज्य संघटनेने दिला आहे. कर्नाटकमध्ये मंगळवारी दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक वाहनांची तोडफोड करत महाराष्ट्रातील वाहनांना अडविण्यात आले होते. त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि विविध संघटना आक्रमक होतांना दिसून येत आहे.
स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत अन्यथा मला कर्नाटकमध्ये यावे लागेल असा इशारा दिल्याने स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
नाशिक मधील स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कर्नाटक बँकेच्या बाहेर निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
कर्नाटक बँकेच्या बाहेर असलेल्या फलकांना काळे फासण्यात आले आहे. त्यामध्ये भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असा उल्लेख करत कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना आडवू नका, तुमच्याही गाड्यांना काचा आहे असा गर्भित इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे.