AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकऱ्या द्या….दप्तर घ्या….विद्यार्थ्यांनी केले भन्नाट आंदोलन, झाली जोरदार चर्चा…

शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही तो मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले जात असतांना नाशिकमध्ये शाळा यूनिट बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

बकऱ्या द्या....दप्तर घ्या....विद्यार्थ्यांनी केले भन्नाट आंदोलन, झाली जोरदार चर्चा...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 11, 2022 | 4:50 PM
Share

नाशिक : पटसंख्येच्या मुद्द्यावरून राज्यातील अनेक शाळा (School) बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. त्याचाच फटका इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील दरेवाडी येथील विद्यार्थ्यांना बसला आहे. तब्बल एक महिन्यापासून शाळा यूनिट बंद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी याबाबत निवेदन देत शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. आदिवासी भागातील (Tribal Area) चाळीस कुटुंबासाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र, पटसंख्येच्या अभावी शाळा यूनिट बंद झाल्याने महिनाझाला शाळा भरत नसल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये येत जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बकऱ्या हातात घेऊन येत बकऱ्या द्या….दप्तर घ्या….अशा घोषणा देत अनोखे आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाचेच हे आंदोलन लक्ष वेधून घेत आहे

शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही तो मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले जात असतांना नाशिकमध्ये शाळा यूनिट बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

पटसंख्येच्या मुद्द्यावरून नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा यूनिट बंद करण्यात आले होते.

आदिवासी भागातील दरेवाडी येथे चाळीस कुटुंबासाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती, मात्र आता पटसंख्या नसल्याने शाळा बंद केली आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्र देत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

यापूर्वी शाळा सुरू करावी यासाठी दरेवाडी येथील नागरीकांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते, मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनोखे आंदोलन केले आहे.

40 कुटुंबासाठी ही पहिली ते पाचवी अशी शाळा जिल्हा परिषद अंतर्गत सुरू होती, एक महिन्यापासून मुले शिक्षणापासून वंचित आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.