Nanded : तिन्ही सांजेला सांजवातीने नदी उत्सवाची सांगता, त्रिकुट येथे रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रमाचा समारोप!

नांदेडपासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले त्रिकुट हे गोदावरी आणि आसना नदीच्या संगमाचे गाव आहे. इथला संगमाचा नितांत सुंदर काठ आणि या पात्रातील पाण्यात विसावलेल्या प्राचीन गणपती मंदिरामुळे हे ठिकाण तसे अनेकांच्या श्रद्वेचे आणि भक्तीचे आहे.

Reporter Rajiv Giri | Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 8:14 AM
1 / 7
नांदेडपासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले त्रिकुट हे गोदावरी आणि आसना नदीच्या संगमाचे गाव आहे. इथला संगमाचा नितांत सुंदर काठ आणि या पात्रातील पाण्यात विसावलेल्या प्राचीन गणपती मंदिरामुळे हे ठिकाण तसे अनेकांच्या श्रद्वेचे आणि भक्तीचे आहे.

नांदेडपासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले त्रिकुट हे गोदावरी आणि आसना नदीच्या संगमाचे गाव आहे. इथला संगमाचा नितांत सुंदर काठ आणि या पात्रातील पाण्यात विसावलेल्या प्राचीन गणपती मंदिरामुळे हे ठिकाण तसे अनेकांच्या श्रद्वेचे आणि भक्तीचे आहे.

2 / 7
नुकत्याच सुरु झालेल्या कडाक्याच्या थंडीतही हा काठ वेगळया ऊर्जेची अनुभूती देत आहे. याचे साक्षीदार आहेत पंचक्रोशीतील नागरिक आणि जिल्हा प्रशासनाची टीम.

नुकत्याच सुरु झालेल्या कडाक्याच्या थंडीतही हा काठ वेगळया ऊर्जेची अनुभूती देत आहे. याचे साक्षीदार आहेत पंचक्रोशीतील नागरिक आणि जिल्हा प्रशासनाची टीम.

3 / 7
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांत गोदावरी आणि आसना नदीच्या त्रिकुट येथील संगमाचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने त्रिकुटच्या काठावर स्वच्छतेसह लोकसहभागातून अनेक उपक्रम आठ दिवसापासून सुरु आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांत गोदावरी आणि आसना नदीच्या त्रिकुट येथील संगमाचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने त्रिकुटच्या काठावर स्वच्छतेसह लोकसहभागातून अनेक उपक्रम आठ दिवसापासून सुरु आहेत.

4 / 7
उपक्रमांची सांगता संगमाच्या पात्रात तिन्ही सांजेला सांजवातीने करण्यासाठी महिला पुढे सरसावल्या. नदीच्या पावित्र्यासह तिला आमच्या कडून आणखी प्रदूषित  होऊ देणार नाही यांची खूणगाठ मनाशी बांधत महिलांसह उपस्थितांनी या सांजवातेसह दिव्यांना संगमाच्या पाण्यात प्रवाही केले.

उपक्रमांची सांगता संगमाच्या पात्रात तिन्ही सांजेला सांजवातीने करण्यासाठी महिला पुढे सरसावल्या. नदीच्या पावित्र्यासह तिला आमच्या कडून आणखी प्रदूषित  होऊ देणार नाही यांची खूणगाठ मनाशी बांधत महिलांसह उपस्थितांनी या सांजवातेसह दिव्यांना संगमाच्या पाण्यात प्रवाही केले.

5 / 7
या उपक्रमात नदी स्वच्छतेपासून मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, कोविड लसीकरण, बचतगटाच्या महिलांच्या पुढाकारातून संगमाच्या काठाची स्वच्छता, योगा शिबिर, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.

या उपक्रमात नदी स्वच्छतेपासून मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, कोविड लसीकरण, बचतगटाच्या महिलांच्या पुढाकारातून संगमाच्या काठाची स्वच्छता, योगा शिबिर, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.

6 / 7
या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसहभागाची वेगळी शक्ती सर्वांनी अनुभवली आहे. माता साहिब गुरुद्वारा व गावकऱ्यांनी जो सहभाग दिला तो महत्वाचा असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसहभागाची वेगळी शक्ती सर्वांनी अनुभवली आहे. माता साहिब गुरुद्वारा व गावकऱ्यांनी जो सहभाग दिला तो महत्वाचा असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

7 / 7
रिव्हर्स ऑफ इंडियाच्या निमित्ताने मानवी जीवनातील, पर्यावरण संतुलनातील नदीच्या महत्वासह तीच्या प्रती अधिक जबाबदार वर्तन गावकऱ्यांकडून, नागरिकांकडून व्हावे या उद्देशाने हा विशेष उपाक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला. यापुढेही आम्ही जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसहभागावर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

रिव्हर्स ऑफ इंडियाच्या निमित्ताने मानवी जीवनातील, पर्यावरण संतुलनातील नदीच्या महत्वासह तीच्या प्रती अधिक जबाबदार वर्तन गावकऱ्यांकडून, नागरिकांकडून व्हावे या उद्देशाने हा विशेष उपाक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला. यापुढेही आम्ही जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसहभागावर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us