भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, मग जे घडले ते भयंकर !

| Updated on: Mar 13, 2023 | 7:43 PM

नांदेड जिल्ह्यातील चार तरुण हैदराबादला एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून चौघेही कारने घरी परतत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, मग जे घडले ते भयंकर !
नांदेडमधील चौघांचा हैदराबादमध्ये कार अपघातात मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

नांदेड / राजीव गिरी : घरगुती कार्यक्रमासाठी हैदराबादला गेलेल्या तरुणांच्या गाडीला नांदेडला परतत असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादहून नागपूरकडे निघालेली भरधाव कार उभ्या असलेल्या कंटेनरच्या खाली घुसल्याने हा भीषण अपघात झाला. निजामाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. मृतांमध्ये सख्या भावांचा समावेश आहे. गणेश निरडी, आदित्य निरडी, प्रकाश अंकलवार आणि साईराम बाळू सनपरामू अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाटवण्यात आले.

चौघेही नांदेडच्या कुंडलवाडी गावचे रहिवासी

चौघे तरुण नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी गावातील रहिवासी आहेत. चौघेही हैदराबाद येथील येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते कारने परतत होते. निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट कंटेनरखाली घुसली.

चौघांचा जागीच मृत्यू

अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचाही चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह बाहेर काढत निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणांच्या मृत्यूमुळे कुंडलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तर निरडी कुटुंबातील दोघा भावांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा