“सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार निप्पाणीला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा”

| Updated on: Dec 26, 2022 | 1:50 PM

महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापुरात रॅली...

1 / 5
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुरात रॅली काढण्यात आली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुरात रॅली काढण्यात आली आहे.

2 / 5
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या रॅलीमध्ये काही राजकीय नेतेही सहभागी झाले आहेत. खासदार संजय महाडिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या रॅलीमध्ये काही राजकीय नेतेही सहभागी झाले आहेत. खासदार संजय महाडिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

3 / 5
यावेळी बोलताना "सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार आणि निप्पाणी या भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा", अशी मागणी संजय महाडिक यांनी केली आहे.

यावेळी बोलताना "सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार आणि निप्पाणी या भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा", अशी मागणी संजय महाडिक यांनी केली आहे.

4 / 5
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर हक्क सांगितला आणि मागच्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर हक्क सांगितला आणि मागच्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

5 / 5
ही केस कोर्टात आहे. याचा निकाल लागेपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली जात आहे. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले.

ही केस कोर्टात आहे. याचा निकाल लागेपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली जात आहे. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले.