AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, नोकरीचे आमिष देऊन अडीच हजार महिलांना नेले आखातामध्ये

पुणे शहरातील अनेक महिलांची फसवणूक झाली आहे. विदेशातील नोकरीचे ऑफर असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. एकूणअडीच हजार महिलांची फसवणूक झाल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेय.

धक्कादायक, नोकरीचे आमिष देऊन अडीच हजार महिलांना नेले आखातामध्ये
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 31, 2023 | 10:54 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे : विदेशातील नोकरीचे ऑफर असल्याचे सांगत राज्यातील अडीच हजार महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यात पुणे शहरातील अनेक महिला असल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याचे आवाहन केलेय. यासंदर्भात केंद्र सरकारची मदत घेऊन या महिलांची सुटका करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

नेमके काय घडले

विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक जणांची फसवणूक केली जाते. आता राज्यातील अडीच हजार महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उघडकीस आणला आहे. राज्यातील या सर्व महिला ओमानमध्ये अडकल्या आहेत .या महिलांना चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून ओमानमध्ये नेण्यात आले आहे. त्यात पुणे शहरातील अनेक महिला असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना केले आवाहन

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. त्यांनी या प्रकारात लक्ष देऊन केंद्र सरकारच्या मदतीने त्या महिलांची सुटका करावी, अशी मागणी केलीय.

भारतीय तरुण व तरुणींना आकर्षक नोकऱ्यांचे प्रलोभन देऊन फसवणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. या नोकर्‍या बनावट कॉल सेंटर्स आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीतद्वारे ऑफर केल्या जात आहेत. दुबई आणि भारतातील एजंटांकडून नोकऱ्यांच्या नावाखाली सोशल मीडिया जाहिरातींद्वारे त्यांची फसवणूक केली जात आहे.

सुषमा अंधारे प्रकरात केली नाराजी व्यक्त

गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची तक्रार पोलिसांनी दाखल करून न घेतल्याने महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गृह खात्यावरती नाराजी व्यक्त केलीये.  महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतके वेळ पोलीस स्टेशनला बसवावं लागतं, त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांना आयोगाला तक्रार करावी लागली हे दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर तक्रार जर दाखल करून घेत नसेल तर निंदनीय याची खंत त्यांनी व्यक्त केलीये.

दिवसेंदिवस जाहीर सभांमधून एखाद्या महिलेवर टीका करताना अतिशय पातळी सोडून भाषा वापरण्याचं प्रमाण वाढलेय. यासंदर्भात महिलांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेऊन तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देत असल्याच त्यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.