AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीत बायोलॉजी नसताना बनता येईल डॉक्टर, नियमात बदल

NMC NEET UG 2024 Eligibility Criteria : बारावीच्या नीट परीक्षेसंदर्भातील नियमात मोठा बदल झाला आहे. बारावीत आता बायोलॉजी नसताना डॉक्टर होता येणार आहे. येत्या 2024 च्या नीट परीक्षेपासून हा नियम करण्यात आला आहे. यामुळे बारावीत बॉयोलॉजी नसताना डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

बारावीत बायोलॉजी नसताना बनता येईल डॉक्टर, नियमात बदल
नीट Image Credit source: Social Media
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 24, 2023 | 8:22 AM
Share

पुणे, दि. 24 नोव्हेंबर | बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बारावीत विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटीक्स घेतले असेल तरी तुम्हाला डॉक्टर होता येणार आहे. मेडिकल प्रवेशासाठी आता बारावीत बायोलॉजी विषयाची सक्ती राहणार नाही. यासंदर्भातील अट बदलण्यात आली आहे. नॅशनल मेडिकल कमीशनकडून यासंदर्भात नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. येत्या 2024 पासून हा निर्णय लागू होणार आहे. परंतु बॉयोलॉजी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी/बायो-टेक्नोलॉजीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. भारतीय मेडिकल कमीशनकडून (MCI) पदवी चिकित्सा शिक्षासंदर्भातील 1997 च्या नियमात बदल केला आहे. त्यानियमानुसार बारावीत बॉयोलॉजी असणारे विद्यार्थींची मेडिकलची प्रवेश परीक्षा देऊ शकत होते.

विदेशात शिक्षण करता येणार

MCIच्या नवीन नियमानुसार, बॉयोलॉजी नसणारे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विदेशात जाऊ शकतात. यापूर्वी अकरावी, बारावीत बॉयोलॉजी असणे गरजेचे होते. पूर्वी ग्रेजुएट मेडिकल एजुकेशन, 1997 नियमानुसार एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी अकरावी आणि बारावीत दोन वर्ष बॉयोलॉजी पडणे गरजेचे होते. हा अभ्यासक्रम नियमित कॉलेजमधून पूर्ण करावा लागणार होता. दिल्ली उच्च न्यायालयाने 2018 मध्ये हा नियम रद्द केला. नवीन नियमामुळे मेडिकल डिग्री घेण्यास इच्छूक असणाऱ्या ए ग्रुपच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात 14 जून 2023 MCI ची बैठक झाली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

नीटसाठी सर्व मंडळांना एकत्र

केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाने नीट परीक्षेसाठी देशातील सर्व बोर्डांना एकत्र आणले आहे. CBSE आणि CISCE ही दोन बोर्ड राष्ट्रीय स्तरावर आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यात बोर्ड आहे. अशी एकूण ६० बोर्ड आहेत. प्रत्येक बोर्डाचा शैक्षणिक दर्जा आणि अभ्यासक्रम वेगळा असतो. तसेच परीक्षांचे निकाल आणि मूल्यमापन यामध्ये फरक असतो. यामुळे या सर्वांमध्ये एकसमानता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहेत. मेडीकलच्या प्रवेशासाठी NEET आणि इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी JEE Main परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. त्यामुळे बोर्डानुसार फरक पडतो. तो पडू नये, अशी भूमिका केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतली आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?