पुणे: जून महिन्यातील उत्तरार्ध आणि जुलैच्या पूर्वाधात दडी मारलेल्या पावसाने राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत यावर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस (Rain) पडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे.
धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून सध्या 11.3 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 9.47 टीएमसी पाणीसाठा होता.
तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 1 जूनपासून या परिसरात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात पवना धरणक्षेत्रात 484 मिमी पाऊस झाला होता. सध्या पवना धरण 40.44% टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 2.59 टक्के तर 1 जूनपासून पाणीसाठ्यात 8.85 टक्के इतकी वाढ झाली आहे.
डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला आहे.
मोडकसागर – 66,092
तानसा- 78,467
मध्य वैतरणा- 37,551
भातसा- 1,97,321
तुळशी- 8,046
विहार- 27,698
बंधित बातम्या :
Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु
पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका
(Water level of dams increases in Pune due to heavy rain)