AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane hospital death | ‘माझा भाऊ तक्रार करुन मला मिळणार नाही, पण…’, ऋता आव्हाड यांना ती बहिण काय म्हणाली?

Thane hospital death | "त्यादिवशी एक मुलीला पोलिओ इंजेक्शन दिलं, त्याची रिएक्शन झाली. पायातून सलायन दिल होतं, ते काढताना इन्फेक्शन झालं. स्टाफ ट्रेन नाहीय का? वशिल्याच्या नेमणूका आहेत का?"

Thane hospital death | 'माझा भाऊ तक्रार करुन मला मिळणार नाही, पण...', ऋता आव्हाड यांना ती बहिण काय म्हणाली?
kalwa chhatrapati shivaji maharaj hospital 17 Death
| Edited By: | Updated on: Aug 13, 2023 | 1:34 PM
Share

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये हे हॉस्पिटल आहे. दोन दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला याचा जाब विचारला होता. आता पुन्हा एकदा त्याच रुग्णालयात अशी घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालयातील उपचारांचा दर्जा, साधन सामुग्री आणि कुशल मनुष्यबळाचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. प्रशासनावर कठोर टीका केली.

‘तर मी लढले असते’

या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या निनाद लोकूर यांचा कालरात्री मृत्यू झाला. त्याच्या भगिनी कल्याणहून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. “मी सख्ख्या भावाला डेंग्यु झाला होता. त्याला इंटर्नल ब्लिडिंग सुरु होतं. तो जाणार की, नाही जाणार? हे मला माहित नव्हतं. पण त्याची कंडीशन क्रिटिकल होती. माझा काही आरोप नाही. पण तासाभरात 14 रुग्ण गेलेत. तक्रार करुन मला माझा भाऊ परत मिळणार नाही. तो मिळणार असता, तर मी लढले असते. तासाभरात 14 रुग्ण गेले, त्याकडे लक्ष द्याव” असं ती भगिनी म्हणाली.

कोणाला कोणाच्या आयुष्याशी खेळायचता अधिकार दिला आहे का?

आधी मूळात प्रशासन आहे का ? असा सवाल ऋता आव्हाड यांनी केला. “जर का प्रशासनाला काही प्रशासनिक, हॉस्पिटलला समस्या असतील, तर तो पॉलिसी मॅटर आहे. दरवेळेला पेशंट आले, आम्ही फोन केला की, डॉक्टर नाही, स्टाफ नाही आम्ही काय करु? बेड नाही, अशी कारण सांगितली जातात. अन्यथा हॉस्पिटलला टाळं लावा. कोणाला कोणाच्या आयुष्याशी खेळायचता अधिकार दिला आहे का? ज्यांना खासगी उपचार परवडत नाही असे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येतात” असं ऋता आव्हाड म्हणाल्या. वशिल्याच्या नेमणूका आहेत का?

“त्यादिवशी एक मुलीला पोलिओ इंजेक्शन दिलं, त्याची रिएक्शन झाली. पायातून सलायन दिल होतं, ते काढताना इन्फेक्शन झालं. स्टाफ ट्रेन नाहीय का? वशिल्याच्या नेमणूका आहेत का? जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल ऋता आव्हाड यांनी विचारला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.