School Fee Issue : उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकांचा गोंधळ, फी वाढीविरोधात नागरिक संतप्त

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष शाळा बंद होत्या. आता नियमित शाळा सुरू होत असल्याने पालक जेव्हा शाळेत आले होते, तेव्हा 18 हजार रुपये असलेली फी 30 हजार रुपये झाल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. तसेच ही फी एकदम एकदाच भरावी असं पालकांना सांगण्यात आलं. त्यामुळे सर्व पालकांनी शाळेत गोंधळ घातला.

School Fee Issue : उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकांचा गोंधळ, फी वाढीविरोधात नागरिक संतप्त
उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकांचा गोंधळ
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 12:44 AM

उल्हासनगर : उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकां (Parents)नी सोमवारी प्रचंड गोंधळ घातला. विद्यार्थ्यांची यावर्षीची शाळेची फी (School Fee) दुपटीने वाढवल्याबद्दल पालक शाळेत जमले होते. तसेच ही फी एकदम भरावी असेही शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याने पालक संतप्त झाले. आधीच कोरोनाने कंबरडे मोडले आहे. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही अजून बेरोजगार आहेत तर काही तुटपुंज्या पगारावर तडजोड केली आहे. अशातच शाळेने दुप्पट फी (Double Fee) केल्याने पालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, शिवसेना शहर युवा सचिव आणि पोलीस यांनी मध्यस्थी करुन तूर्तास तोडगा काढला आहे. मात्र शाळेने दिलेला शब्द न पाळल्यास शाळेबाहेर ठिय्या आंदोन करण्यात येईल, असा इशारा संदीप गायकवाड यांनी दिला आहे.

पालकांना तीन इंस्टॉलमेंटमध्ये फी भरण्यास मुभा

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष शाळा बंद होत्या. आता नियमित शाळा सुरू होत असल्याने पालक जेव्हा शाळेत आले होते, तेव्हा 18 हजार रुपये असलेली फी 30 हजार रुपये झाल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. तसेच ही फी एकदम एकदाच भरावी असं पालकांना सांगण्यात आलं. त्यामुळे सर्व पालकांनी शाळेत गोंधळ घातला. या गोंधळामुळे पोलिसांना बोलाविण्यात आले. उल्हासनगर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप गायकवाड आणि शिवसेना शहर युवा सचिव आणि पोलीस यांनी पालकांतर्फे शाळेच्या प्रिंसिपल यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेत अंतिम निर्णय घेण्यात आला की, ज्या पालकांना एकदम फी भरण्याची ऐपत नाही, अशा पालकांना तीन इंस्टॉलमेंटमध्ये फी भरण्यास मुभा देण्यात यावी.

तसेच कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले, त्यांना पुढच्या वर्गात बसविण्यात यावे. यासाठी पालकांनी शाळेत विनंती अर्ज केल्यास ती विनंती आम्ही पूर्ण करू असं शाळेच्या मुख्याध्यापिकांनी म्हटलं आहे. मात्र पालकांनी विनंती अर्ज केल्यावरच त्या त्या समस्येवर विचार केला जाईल, असं मुख्याध्यापिकांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, पालकांच्या समस्यांचं तूर्तास समाधान केलं गेलं असलं तरी शाळेने म्हटल्याप्रमाणे पालकांना सहकार्य न केल्यास शाळेत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांनी केला आहे. (Parents angry over double fees at New Era Primary School in Ulhasnagar)