भोर तालुक्यात पहाटेच्या वेळी देवगाणी म्हणत गाव जागवतो पिंगळा, अजूनही ग्रामीण भागात जपली जातेय परंपरा

भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात या ना त्या गावात गेल्या महिनाभरापासून पिंगळ्याचा सुमधुर आवाज घुमू लागला असून पिंगळा पारंपरिक लोककलेची जपणूक करीत असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Mar 05, 2026 | 5:53 PM
1 / 6
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून पारंपरिक लोककलेचा भाग असलेल्या पिंगळ्याचा सुमधुर आवाज पुन्हा घुमू लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून पारंपरिक लोककलेचा भाग असलेल्या पिंगळ्याचा सुमधुर आवाज पुन्हा घुमू लागला आहे.

2 / 6
पहाटेच्या वेळी गावोगावी फेरी मारत पिंगळा देव-देवतांची गाणी म्हणत लोकांना जागे करतो. ग्रामीण भागातील माय-माऊली पिंगळारूपी मानवाला देवासमान मानून त्याला ज्वारी, गहू, तांदूळ यांसारखे धान्य तसेच रोख स्वरूपात दान देत आहेत.

पहाटेच्या वेळी गावोगावी फेरी मारत पिंगळा देव-देवतांची गाणी म्हणत लोकांना जागे करतो. ग्रामीण भागातील माय-माऊली पिंगळारूपी मानवाला देवासमान मानून त्याला ज्वारी, गहू, तांदूळ यांसारखे धान्य तसेच रोख स्वरूपात दान देत आहेत.

3 / 6
सध्याच्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना पिंगळा, वासुदेव आणि नंदीबैल यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात पारंपरिक संस्कृती जपली जात असल्याचे दिसून येते.

सध्याच्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना पिंगळा, वासुदेव आणि नंदीबैल यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात पारंपरिक संस्कृती जपली जात असल्याचे दिसून येते.

4 / 6
दिवाळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हे कलाकार गावोगावी फिरत देव-देवतांची गाणी सादर करतात. नंदीबैलाला ‘पाऊस पडेल का?’ असा प्रश्न विचारल्यावर मान डोलावत तो ‘पाऊस पडेल’ असा संकेत देतो अशीही पारंपरिक श्रद्धा आहे.

दिवाळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हे कलाकार गावोगावी फिरत देव-देवतांची गाणी सादर करतात. नंदीबैलाला ‘पाऊस पडेल का?’ असा प्रश्न विचारल्यावर मान डोलावत तो ‘पाऊस पडेल’ असा संकेत देतो अशीही पारंपरिक श्रद्धा आहे.

5 / 6
ग्रामीण भागातील लोकांच्या मते पिंगळा, वासुदेव किंवा नंदीबैल गावात फेरी घालून गेल्यास गावातील संकटे दूर होतात, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभते आणि शेतीला भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे पिंगळा आणि वासुदेवांना दान देणे हे श्रेष्ठ दान मानले जाते.

ग्रामीण भागातील लोकांच्या मते पिंगळा, वासुदेव किंवा नंदीबैल गावात फेरी घालून गेल्यास गावातील संकटे दूर होतात, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभते आणि शेतीला भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे पिंगळा आणि वासुदेवांना दान देणे हे श्रेष्ठ दान मानले जाते.

6 / 6
दरम्यान, पिंगळा आणि वासुदेव गावोगावी फेरी मारण्यामागे केवळ दान करण्याची अपेक्षा नसून पारंपरिक कलेची जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे पिंगळा जोशी बारामतीकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, पहाटेच्या फेरीत पक्ष्यांच्या संकेतांनुसार आशीर्वाद देण्याचीही परंपरा आजही जपली जात आहे.

दरम्यान, पिंगळा आणि वासुदेव गावोगावी फेरी मारण्यामागे केवळ दान करण्याची अपेक्षा नसून पारंपरिक कलेची जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे पिंगळा जोशी बारामतीकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, पहाटेच्या फेरीत पक्ष्यांच्या संकेतांनुसार आशीर्वाद देण्याचीही परंपरा आजही जपली जात आहे.

Follow Us