AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: सवलतीच्या नादी लावून… कुणबी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला खणखणीत इशारा… म्हणाले सर्वांवर पाणी फिरेल…

Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate: मराठा आरक्षणाच्या अनेक प्रलंबित मागण्या राज्य सरकार खटाखट मंजूर करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले असले तरी गृहीत न धरण्याचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले जरांगे पाटील?

Manoj Jarange: सवलतीच्या नादी लावून... कुणबी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला खणखणीत इशारा... म्हणाले सर्वांवर पाणी फिरेल...
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 1:25 PM
Share

राम दखणे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला चांगले यश आले आहे. सरकारने तातडीने काही मागण्याची पूर्तता केली आहे. तर ओबीसींच्या धरतीवर मराठा समाजाला सवलतींना मान्यता दिली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानतानाच एक खणखणीत इशाराही दिला आहे. सवलतीच्या नादी लावून मराठा आरक्षणाचे उद्दिष्ट अधांतरी न ठेवण्याचा सज्जड दम (Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate) त्यांनी दिला आहे. काय म्हणाले जरांगे पाटील?

मूळ आरक्षणाचा विषय बाजूला नको

सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वजण मराठा समाजाची नाराजी अंगावर घेणार नाही असं मला वाटतं. काल त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे मनापासून कौतुक करतो. तुमच्या माध्यमातून माझं एक म्हणणं आहे की,याच्या सवलती ओबीसी प्रमाणे दिलेले आहेत, या फार गरजेच्या होत्या. समाजाला मी ज्यावेळेस पूर्ण काही मिळतं त्यावेळी मी समाधानी असतो, काही प्रमाणात त्यांनी निर्णय घेतले त्याचे श्रेय सुद्धा आम्ही त्यांना दिलं. परंतु माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की राहिलेल्या ज्या मागण्या, आहे त्याला सुद्धा अंमलबजावणी मिळणे गरजेचे आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. जे निर्णय घेतलेले आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे सुद्धा आभार मानतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की हे दिल्यामुळे मराठा समाजाचा विसरून जाईल हे तुमचं अर्धवट स्वप्न राहील.नसता इकडे केलेल्या सगळ्यावर पाणी फिरून जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तुम्ही सवलतीच्या नादी लावून आमचं मूळ आरक्षणाचं बाजूला राहायच हे चालणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

व्हॅलिडीटी रोखण्याचा आरोप

ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या व्हॅलिडीटी रोखण्याचा काम सुरू आहे, त्याकडे बारीक लक्ष सरकारने दिले पाहिजे. 58 लाख नोंदी निघाल्या त्याच्या कोणती प्रमाणपत्र दिले परंतु त्याची व्हॅलिडीटी रोखण्याचं काम झालं. ओबीसी प्रमाणे आम्हाला सवलती दिल्या, आम्ही खुश राहू. परंतु कुणबी मधून ज्या ज्या मुलांनी ॲडमिशन घेतले. नोकरीला लागले यांच्या व्हॅलिडीटीवर सुद्धा सरकारने लक्ष ठेवावं. हैदराबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

58 लाख कुणबी नोंदी निघाल्या त्याची प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. नसता इकडे सगळं केल्यावर पाणी फिरल असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा दिला. कारण तुम्ही सवलतीच्या नादी लावून आमचं मूळ आरक्षणाचं बाजूला राहायचा हे चालणार नाही. सातारा संस्थान आणि औंध संस्थांचा जीआर निघणं गरजे आहे . सरकारचं मी मनापासून आभार मानतो मात्र आमचे पुढचे काम थांबवू नका, तुम्हाला असं वाटत असेल की हे दिल्यामुळे मराठा समाजाचा विसरून जाईल हे तुमचं अर्धवट स्वप्न राहील. हे सगळे काम झाल्यावर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी नेत्यांवर तोंडसुख

कोण काय बोलत त्याला काय महत्त्व द्यायची गरज नाही याची दखल घ्यायची नाही, जे मराठ्यांचे शत्रू आहेत जे मराठ्यांच्या विरोधात काम करतात त्याची दखल घ्यायची नाही. हे ओबीसी चे नेते नाहीत ओबीसीचा नेता वेगळा असतो, तो समान सगळ्यांच्या लेकरासाठी लढणारा असतो तो नेता असतो. हे ओबीसी नेते नाही तर लाभार्थी टोळीचे छोट्या छोट्या जातीचे नेते आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी बबनराव पायवाडे यांच्यासह लक्ष्मण हाके यांच्यावर केला. ओबीसींचा नेता या राज्यामध्ये होऊ शकत नाही, जातीच्या आड लपवायचं आणि ओबीसी च नाव घ्यायचं, यांनी ओबीसी साठी काय केलं, मायक्रो ओबीसींचा किती धिंगाणा झाला ओबीसींच्या जातीचं काय वाटोळ झालं, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

हे बळजबरीने स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत असल्याचा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. सरकारला सुद्धा माहीत झालेला आहे की यांचे उडी कुठ पर्यंत आहे, लाभासाठी थांबलेले आहे, लाभाची वाट पाहत आहे. मी त्याला मोजत नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांना टोला लगावला. आम्हाला मिळायला लागलं की जळणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तुमच्यामध्ये जी खोड आहे की सरकारने ओळखलेली आहे, लाभापोटी थांबलेले लोक कोण कोण? हे फक्त लाभ घेण्यासाठी थांबलेले आहे असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांवर केला.

Follow Us
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम...
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता...
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर.....
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट,
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण
एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं
Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा,
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर!
Shivsena ubt | ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर! मालमत्तेच्या चौकशीने खळबळ
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353
Video | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह