AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: सवलतीच्या नादी लावून… कुणबी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला खणखणीत इशारा… म्हणाले सर्वांवर पाणी फिरेल…

Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate: मराठा आरक्षणाच्या अनेक प्रलंबित मागण्या राज्य सरकार खटाखट मंजूर करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले असले तरी गृहीत न धरण्याचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले जरांगे पाटील?

Manoj Jarange: सवलतीच्या नादी लावून... कुणबी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला खणखणीत इशारा... म्हणाले सर्वांवर पाणी फिरेल...
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 1:25 PM
Share

राम दखणे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला चांगले यश आले आहे. सरकारने तातडीने काही मागण्याची पूर्तता केली आहे. तर ओबीसींच्या धरतीवर मराठा समाजाला सवलतींना मान्यता दिली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानतानाच एक खणखणीत इशाराही दिला आहे. सवलतीच्या नादी लावून मराठा आरक्षणाचे उद्दिष्ट अधांतरी न ठेवण्याचा सज्जड दम (Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate) त्यांनी दिला आहे. काय म्हणाले जरांगे पाटील?

मूळ आरक्षणाचा विषय बाजूला नको

सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वजण मराठा समाजाची नाराजी अंगावर घेणार नाही असं मला वाटतं. काल त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे मनापासून कौतुक करतो. तुमच्या माध्यमातून माझं एक म्हणणं आहे की,याच्या सवलती ओबीसी प्रमाणे दिलेले आहेत, या फार गरजेच्या होत्या. समाजाला मी ज्यावेळेस पूर्ण काही मिळतं त्यावेळी मी समाधानी असतो, काही प्रमाणात त्यांनी निर्णय घेतले त्याचे श्रेय सुद्धा आम्ही त्यांना दिलं. परंतु माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की राहिलेल्या ज्या मागण्या, आहे त्याला सुद्धा अंमलबजावणी मिळणे गरजेचे आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. जे निर्णय घेतलेले आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे सुद्धा आभार मानतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की हे दिल्यामुळे मराठा समाजाचा विसरून जाईल हे तुमचं अर्धवट स्वप्न राहील.नसता इकडे केलेल्या सगळ्यावर पाणी फिरून जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तुम्ही सवलतीच्या नादी लावून आमचं मूळ आरक्षणाचं बाजूला राहायच हे चालणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

व्हॅलिडीटी रोखण्याचा आरोप

ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या व्हॅलिडीटी रोखण्याचा काम सुरू आहे, त्याकडे बारीक लक्ष सरकारने दिले पाहिजे. 58 लाख नोंदी निघाल्या त्याच्या कोणती प्रमाणपत्र दिले परंतु त्याची व्हॅलिडीटी रोखण्याचं काम झालं. ओबीसी प्रमाणे आम्हाला सवलती दिल्या, आम्ही खुश राहू. परंतु कुणबी मधून ज्या ज्या मुलांनी ॲडमिशन घेतले. नोकरीला लागले यांच्या व्हॅलिडीटीवर सुद्धा सरकारने लक्ष ठेवावं. हैदराबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

58 लाख कुणबी नोंदी निघाल्या त्याची प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. नसता इकडे सगळं केल्यावर पाणी फिरल असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा दिला. कारण तुम्ही सवलतीच्या नादी लावून आमचं मूळ आरक्षणाचं बाजूला राहायचा हे चालणार नाही. सातारा संस्थान आणि औंध संस्थांचा जीआर निघणं गरजे आहे . सरकारचं मी मनापासून आभार मानतो मात्र आमचे पुढचे काम थांबवू नका, तुम्हाला असं वाटत असेल की हे दिल्यामुळे मराठा समाजाचा विसरून जाईल हे तुमचं अर्धवट स्वप्न राहील. हे सगळे काम झाल्यावर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी नेत्यांवर तोंडसुख

कोण काय बोलत त्याला काय महत्त्व द्यायची गरज नाही याची दखल घ्यायची नाही, जे मराठ्यांचे शत्रू आहेत जे मराठ्यांच्या विरोधात काम करतात त्याची दखल घ्यायची नाही. हे ओबीसी चे नेते नाहीत ओबीसीचा नेता वेगळा असतो, तो समान सगळ्यांच्या लेकरासाठी लढणारा असतो तो नेता असतो. हे ओबीसी नेते नाही तर लाभार्थी टोळीचे छोट्या छोट्या जातीचे नेते आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी बबनराव पायवाडे यांच्यासह लक्ष्मण हाके यांच्यावर केला. ओबीसींचा नेता या राज्यामध्ये होऊ शकत नाही, जातीच्या आड लपवायचं आणि ओबीसी च नाव घ्यायचं, यांनी ओबीसी साठी काय केलं, मायक्रो ओबीसींचा किती धिंगाणा झाला ओबीसींच्या जातीचं काय वाटोळ झालं, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

हे बळजबरीने स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत असल्याचा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. सरकारला सुद्धा माहीत झालेला आहे की यांचे उडी कुठ पर्यंत आहे, लाभासाठी थांबलेले आहे, लाभाची वाट पाहत आहे. मी त्याला मोजत नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांना टोला लगावला. आम्हाला मिळायला लागलं की जळणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तुमच्यामध्ये जी खोड आहे की सरकारने ओळखलेली आहे, लाभापोटी थांबलेले लोक कोण कोण? हे फक्त लाभ घेण्यासाठी थांबलेले आहे असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांवर केला.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?.

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?