मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करतात. मनोज जरांगे हे बीडचे रहिवासी आहेत. पण लग्नानंतर जालन्यातील शहागड ही त्यांनी आपली कर्मभूमी केली. गेल्या 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला आहे. सतत आंदोलनात भाग घेत असल्याने घरातील आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी चार एकर जमिनीपैकी अडीच एकर जमीन विकली होती. सुरुवातीला जरांगे हे काँग्रेसमध्ये काम करायचे. पण नंतर त्यांनी शिवबा संघटना स्थापन करून आरक्षण आंदोलन सुरू केलं. कुटुंबापासून दूर राहून मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लाखा लाखाच्या सभा घेऊन मराठा समाजाला जागृत करत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीतून मराठा आरक्षणासाठी उपोषणं सुरू केली होती. त्यांनी अनेकवेळा उपोषण केलं. त्याचा परिणाम म्हणून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याचं वाटप सुरू करण्याचं काम सरकारने केलं. तसेच सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मनोज जरांगे पाठपुरावा करत आहेत. काही प्रमाणात त्याला यशही आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं फलित म्हणून सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
Read Moreहैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिक विमा आणि हैदराबाद गॅझेटबाबत महत्त्वाची माहिती दिली. हैदराबाद गॅझेटची मागणी पूर्ण झाली असून वंशावळ शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, पंचनामे नीट होतील याची ग्वाही त्यांनी दिली.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 17, 2026
- 2:59 pm
डंके की चोट पर सांगतो, मनोज जरांगे आता… गुणरत्न सदावर्ते यांचा सर्वात मोठा दावा काय?
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. २० दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे यांचा ‘रिॲलिटी शो’ संपला असून, ते आता कधीच राजकीयदृष्ट्या उभे राहणार नाहीत असा सदावर्ते यांचा दावा आहे. आरक्षणाच्या मागण्या घटनाबाह्य असून, एका समाजाला तीन वर्गात मागास घोषित करता येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निजामी कागदपत्रे अवैध ठरवली.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 17, 2026
- 1:20 pm
Manoj Jarange Patil : रात्रीच्या अंधारात मनोज जरांगेंनी सरकारबरोबर.. सेटलमेंटचा मोठा आरोप
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 20 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आंदोलन मागे घेतलं आहे. त्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 17, 2026
- 1:21 pm
सेटलमेंटनंतर आंदोलन मागे? जरांगेंवर गंभीर आरोप; अजय महाराज बारस्करांनी उडवली खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांचे उपोषण मागे घेतले असले तरी जरांगेंवर आता यामुळे आरोप केले जात आहेत. मराठा अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी जरांगेंवर 'सेटलमेंट' केल्याचा आरोप केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित वाळू माफिया आणि ईडी चौकशी टाळण्यासाठी जरांगेंनी उपोषण सोडल्याचा आरोप बारस्करांनी केला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 17, 2026
- 12:49 pm
पॅरिसमधून रात्रभर सूत्रे हलली अन् जरांगेंनी उपोषण सोडलं; इन्साईड स्टोरी आली समोर
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 20 दिवसांचं उपोषण सोडलं. पॅरिसमधून सूत्रं हलली आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही मध्यस्थी केली. मराठा आरक्षण आंदोलनाची ही इन्साईड स्टोरी समोर आली आहे. गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी जरांगेंनी एक पाऊल मागे घेतल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 17, 2026
- 12:22 pm
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मुंबईत कोणीही भीक घालणार नाही या भीतीने मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. हाकेंनी जरांगे पाटलांवर टीका करत, त्यांचे आंदोलन म्हणजे ‘रियालिटी शो’ चा फिनाले होता असे म्हटले. जरांगे पाटलांच्या मागणीला अनेक नेत्यांनी खतपाणी घातल्याचा आरोपही त्यांनी केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 17, 2026
- 12:00 pm
उपोषण सोडताच मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, बीड सोडून थेट संभाजीनगरला रवाना; कारण काय?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बीडहून तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे नेण्यात येत आहे. रुग्णालयात त्यांना तातडीने अॅडमिट केले जाणार आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 17, 2026
- 10:17 am
CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis : आज अखेर 20 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहेत. त्या शिवाय ते UPI पेमेंटवर शुल्क आकारलं जाणार त्यावरही बोलले आहेत.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 17, 2026
- 10:13 am
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित केले असून, सरकारला ९० दिवसांची मुदत दिली आहे. ५८ लाख नोंदी कमी होणार नाहीत, अशी लेखी हमी आणि फडणवीसांची सही असावी, तसेच हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 17, 2026
- 9:19 am
Manoj Jarange Patil | 20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
मनोज जरांगे पाटील यांनी आपले २० दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आता उपचारांसाठी बीडहून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात रवाना झाले आहेत. या रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 17, 2026
- 8:52 am
20 दिवसांच्या उपोषणानंतरही… बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगेंना डिवचले, 58 लाख कुणबी नोंदी होणारच नाही? मोठा दावा काय?
Babanrao Taywade on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी आज 20 व्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले. त्यावरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील यांना डिवचले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 17, 2026
- 8:52 am
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण ९० दिवसांची मुदत देत मागे घेतले आहे. ५८ लाख नोंदी कायम राहतील आणि हैदराबाद गॅझेट सुधारित केले जाईल यावर त्यांनी भर दिला. समाजासाठी लढण्याची आपली भूमिका स्पष्ट करत, मागील उपोषणांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 17, 2026
- 8:34 am