AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!

महाराष्ट्रात आज जार शहरात चार वेगवेगळे भयंकर अपघात झाले आहेत. या अपघातात काही ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी लोक गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!
accident newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 5:02 PM
Share

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण फिरायला जातात. कुठेतरी दूर फिरायला जायचं म्हणजे लोक आपाल्या वाहनांनी प्रवास करतात. परंतु आता फिरायला किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही प्रवाशांसाठी हा खूपच दुर्दैवी ठरला आहे. कारण रविवारी म्हणजेच 15 मार्च रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. लातूर, नाशिक, सिंधुदर्ग, नवी मुंबई अशा ठिकाणी भयानक अपघात झाले असूनकाही लोकांचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला आहे.

लातूरमध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू

लातूर–तुळजापूर महामार्गावरील करजखेडा चौकातील ब्रिजवर आज भीषण अपघात घडला. बोलेरो, वॅग्नर आणि होंडा सिटी या तीन चारचाकी वाहनांची एकाच वेळी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर काही काळ लातूर–तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या आधीही या भागात महामार्गावर वेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे गंभीर अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नाशिकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील येवला-कोटमगाव रोडवर मोटरसायकलने सायकलस्वारास मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुभाष काळन या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. सदर अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, दुचाकीस्वारदेखील या अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून अपघाताची संपूर्ण घटना त्यात कैद झाली आहे.

सिंधुदुर्गमध्ये भरधाव कारचा अपघात

सिंधुदुर्गमधील मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ वेताळ बांबर्डे पुलावर आज संध्याकाळी 7.20 च्या सुमारास भरधाव कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे (एम एच 09 जी झेड 5986) मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. महामार्गावरील वेताळ बांबर्डे आणि पणदूर सीमेवरील पुलाची एक बाजू अरुंद असल्याने अपघाताचे केंद्र बनले आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी कारचा अपघात घडला होता.

नवी मुंबईत तरुणीला नेले फरफटत

नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 8 परिसरात भरधाव स्कॉर्पिओने फुटपाथवर चालणाऱ्या तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑरेंज कॉर्नर परिसरात घडलेल्या या भीषण अपघातात स्कॉर्पिओने तरुणीला जवळपास 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर दुचाकी, रिक्षा आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत ही गाडी थांबली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीबीडी बेलापूर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Follow Us
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.