AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: बीसीसीआयला अखेर जागा आली, 164 विकेट्स घेणार्‍या बॉलरला अखेर संघात दिली एन्ट्री, बुमराहची रिप्लेसमेंट कोण?

भारत आणि श्रीलंका यांच्यात आता कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली होती. या संघात आता बीसीसीआयने एक मोठा बदल केला आहे.

IND vs SL: बीसीसीआयला अखेर जागा आली, 164 विकेट्स घेणार्‍या बॉलरला अखेर संघात दिली एन्ट्री, बुमराहची रिप्लेसमेंट कोण?
| Updated on: Aug 03, 2026 | 10:23 AM
Share
भारत आणि श्रीलंका यांच्यात आता कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली होती. या संघात जसप्रीत बुमराहचे कमबॅक पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. पण हा सुखद धक्का काही जास्त काळ टिकला नाही.  श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, या दौऱ्यातून बाहेर झाला आहे.  बुमराहची संघात निवड ही फिटनेसवर आधारित होती. आता तो अजून फिट झाला नाही म्हणून त्याची निवड आता पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता बुमराहच्या जागी कोणता खेळाडू खेळणार याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने आता नाव जाहीर केले आहे.
इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला होता. तो पूर्णपणे बरा न झाल्याने त्याला दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून जसप्रीत बुमराह पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.” जम्मू आणि काश्मीरच्या आकिब नबीची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून ही घोषणा केली.

नबीच्या नावाची घोषणा करताना बीसीसीआयने लिहिले, “पुरुष निवड समितीने बुमराहच्या जागी आकिब नबीची निवड केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.” भारत श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान गॉल येथे खेळला जाईल. दुसरी कसोटी 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथे होईल. त्यापूर्वी, भारतीय संघ 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय सराव सामना खेळेल. भारतीय संघ 4 तारखेला श्रीलंकेसाठी रवाना होईल.

आकिब नबी देशांतर्गत क्रिकेटमधील एक गाजलेले नाव आहे. या 29 वर्षीय खेळाडूने 43 प्रथम-श्रेणी सामने खेळले असून, 71 डावांमध्ये 18.63 च्या प्रभावी सरासरीने 164 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 24 धावांत 7 बळी घेण्याची आहे. आकिब फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतकांसह 999 धावा आहेत.

Follow Us
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?