देवशयनी एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी नकळतपणे सुद्धा करू नका, अन्यथा…
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी अत्यंत विशेष मानली जाते. याला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण अनवधानाने झालेल्या चुकांमुळे भगवान विष्णू क्रोधित होऊ शकतात. चला या दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे ते जाणून घेऊयात.

हिंदू धर्मात देवशयनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगिक निद्रेत प्रवेश करतात, ज्यामुळे चातुर्मासाची सुरुवात होते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळल्या पाहिजेत. असे म्हटले जाते की या नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो, तर त्याकडे दुर्लक्ष केल्यास शुभ फळे कमी होऊ शकतात. चला तर मग देवशयनी एकादशीची तारीख, शुभ वेळ, महत्त्व आणि कोणत्या गोष्टी या दिवशी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.
देवशयनी एकादशी 2026 कधी आहे?
- द्रिक पंचांगानुसार, 2026 साली देवशायनी एकादशी शनिवार 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल.
- एकादशीची सुरुवात: 24 जुलै, 2026, सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल.
- एकादशी तिथी समाप्त: 25 जुलै 2026, सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी संपणार आहे.
- व्रत पारणाची वेळ: 26 जुलै, 2026, सकाळी 5 वाजून 39 मिनिटं ते सकाळी 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल.
देवशायनी एकादशीचे महत्त्व काय आहे?
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रा धारण करतात. त्यानंतर ते पुढील चार महिने, म्हणजेच चातुर्मास विश्राम करतात. मग कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवूठनी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात. चातुर्मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, यज्ञोपवीत संस्कार आणि इतर शुभ विधी केले जात नाहीत. तथापि हा काळ उपासना, उपवास, नामजप, तपश्चर्या आणि आत्मचिंतनासाठी सर्वात शुभ मानला जातो.
देवशायनी एकादशीच्या दिवशी ह्या गोष्टी चुकूनही करू नका
- मांस, मद्य आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळा – देवशायनी एकादशीच्या दिवशी मांस, मासे, अंडी, मद्य आणि इतर तामसिक पदार्थांचे पूर्णपणे सेवन टाळावे. या दिवशी सात्विक अन्न आणि भगवान विष्णूची भक्ती सर्वोत्तम मानली जाते.
- भात खाणे टाळा – एकादशीच्या दिवशी भात खाण्यास मनाई आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भात खाणे उपवासाच्या नियमांविरुद्ध मानले जाते.
- कोणाचाही अपमान करू नका – देवशयनी एकादशीच्या दिवशी गरीब, वृद्ध, संत, आई-वडील आणि गरजू लोकांचा अपमान करणे टाळावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, अशी श्रद्धा आहे.
- खोटेपणा आणि फसवणुकीपासून दूर राहा – धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा एखाद्याचे हक्क हिसकावून घेणे अशुभ मानले जाते.
- नियमांचे पालन केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नका – तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. पूजेसाठी तुळशीच्या पानांची गरज असल्यास ती एक दिवस आधीच तोडून ठेवणे उत्तम. एकादशीच्या दिवशी तुळस तोडणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
- कोणतेही शुभ कार्य सुरू करू नका – देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे या काळात विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा आणि इतर प्रमुख शुभ कार्यक्रम टाळले जातात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
