Delhi Fire : केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत, दिल्लीतल्या आगीत 27 मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भिती कायम

| Updated on: May 13, 2022 | 11:49 PM

अग्निशमन दलाचे (Fire Brigade) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, इमारतीत अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचावकार्यासाठी आम्ही 100 कर्मचाऱ्यांची टीमही तैनात केली आहे.

Delhi Fire : केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत, दिल्लीतल्या आगीत 27 मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भिती कायम
केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील मुंडका इमारतीला शुक्रवारी भीषण आग (Delhi Fire) लागली. या भीषण आगेने देशाला हादरवून सोडले आहे. कारण या आगीत 27 जणांचा (27 Death In Delhi Fire) मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाकांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे (Fire Brigade) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, इमारतीत अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचावकार्यासाठी आम्ही 100 कर्मचाऱ्यांची टीमही तैनात केली आहे. सध्या अग्निशमन विभागाचे पथक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शोधमोहीम राबवत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अशीही माहिती दिली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाकांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

एनडीआरएफची मदत पोहोचणार

दिल्लीतील मुंडका येथील आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. एनडीआरएफही लवकरच तेथे पोहोचणार आहे. लोकांना बाहेर काढणे आणि जखमींना तत्काळ उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

हे सुद्धा वाचा

अमित शाह यांचं ट्विट

राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ लागलेल्या आगीत झालेल्या दुर्घटनेने दुःखी झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत मनापासून संवेदना आणि जखमींनी लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना. असे ट्विट राहुल गांधी यांनी करत शोक व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांचं ट्विट