सुहागरातसाठी खोलीत जाताच तरुणाला बसला प्रचंड धक्का, ओरडतच बाहेर आला अन् म्हणाला माझी बायको…

लग्नानंतर पती -पत्नीसाठी सुहागरात खास असते, ही रात्र कायम आपल्या आठवणीत राहावी असं लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मात्र एका तरुणासोबत याच दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे.

सुहागरातसाठी खोलीत जाताच तरुणाला बसला प्रचंड धक्का, ओरडतच बाहेर आला अन् म्हणाला माझी बायको...
Extramarital Affair
| Updated on: Jun 01, 2025 | 5:20 PM

लग्नानंतर पती -पत्नीसाठी सुहागरात खास असते, ही रात्र कायम आपल्या आठवणीत राहावी असं लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. असंच काहीसं स्वप्न लग्नानंतर मध्य प्रदेशमधील राजगढमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं पाहिलं होतं. मात्र त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. लग्न झाल्यानंतर मधुचंद्राच्या रात्री हा तरुण आपल्या बायकोच्या रूममध्ये गेला, मात्र तिथे गेल्यानंतर त्याला प्रचंड धक्का बसला, माझी बायको कुठे आहे? असं ओरडतच हा तरुण त्या रूमबाहेर पाडला, जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमधून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाचं लग्न झालं मात्र लग्नानंतर काही तासांमध्येच त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. 27 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली, 27 मे रोजी या तरुणाचं मोठ्या थाटात लग्न झालं, मात्र मधुचंद्राच्या काही तास आधीच ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. या घटनेचा तिच्या सासरच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार लग्नानंतर पती मधुचंद्रासाठी आपल्या पत्नीच्या रूममध्ये गेला, त्यानंतर त्याला त्याची पत्नी म्हटली की मी दोन मिनिटांमध्ये आले. माझं काही काम बाकी आहे, तेवढं पूर्ण करून येते. त्यानंतर ती घराच्या बाहेर पडली, घराच्या बाहेर आधीपासूनच तिचा प्रियकर तिची वाट पाहात उभा होता, ती त्याच्या बाईकवर बसली आणि ते दोघे फरार झाले. इकडे या तरुणीचा पती तिची वाट पाहात होता, मात्र बराचवेळ होऊन देखील तरुणी घरी न परतल्यानं तिचा शोध सुरू केला.

मात्र त्यानंतर जेव्हा आपली बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची बातमी तिच्या पतीला कळते तेव्हा दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार राडा झाला, जेव्हा याची माहिती तिच्या प्रियकराला कळाली तेव्हा त्याने या तरुणीला आपल्या माहेरी पाठवलं, मात्र आता या तरुणीच्या पतीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे, यावर पंचायत देखील बोलावण्यात आली होती, प्रियकरानं लग्नात झालेला तीन लाख रुपयांच्या खर्चाची भरपाई द्यावी आणि या तरुणीचा स्वीकार करावा, असा निर्णय पंचायतीने दिला आहे.