Explainer: भारताची ‘समुद्र मंथन’ योजना काय ? सागरतळाशी लावला तब्बल 84,000 कोटी रुपयांचा डाव ?
भारताचा महत्वांकाक्षी 'समुद्रमंथन' प्रकल्प काय आहे? पेट्रोलियम मंत्रालयाला सरकारने या योजनेसाठी तब्बल 84,000 कोटी रुपयांची बिदागी देत आहे. या योजनेमुळे तेल आणि वायूची आयात कमी होणार का ? भारताची सध्याची स्थिती काय आहे? चला जाणून घेऊया...

केंद्रिय मंत्रीमंडळाने अलिकडे भारताच्या समुद्र मंथन योजनेसाठी ८४ हजार ८४ कोटीचे बजेट मंजूर केले आहे. देशभरातील तज्ज्ञांनी ही भारताची दुरगामी योजना असल्याचे म्हटले आहे.या योजनेद्वारे देशाच्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर परदेशातील अवलंबित्व कमी करण्याची योजना. पेट्रोलियम मंत्रालयाने समुद्राच्या तळाशी असलेल्या तेल आणि गॅससाठ्यांना शोधण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या फंडाद्वारे सरकार आता आतापर्यंत न स्पर्श झालेल्या जोखीम भरलेल्या डीप वॉटर एक्सप्लोरेशनला प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. समुद्र मंथन योजना नेमकी काय ? सरकारची समुद्र मंथन योजना ज्याला डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन वा राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजना देखील म्हटले जाते. भारत सरकारची ही एक महत्वाकांक्षी आणि धोरणात्मक मोहिम आहे.याचा हेतू खोल समुद्राच्या आत लपलेल्या कच्चे इंधन, नैसर्गिक गॅस आणि महत्वाच्या खनिजांच्यासाठ्यांचा शोध लावणे आणि त्यांचे उत्पादन करणे आहे. ...