
भारताने अलिकडेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुझ मिसाईलने पाकच्या नाकीनऊ आणले. या ऑपरेशनमध्ये पाकच्या नऊ अतिरेकी अड्ड्यांवर अचूक हल्ला करुन ते नष्ट करण्यात या मिसाईलनी मोठी कामगिरी केली. चार दिवसाच्या या संघर्षात ब्रह्मोसची ताकद आणि अचूकता याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. हे मिसाईल भारत आणि रशियाने एकत्र येऊन तयार केले आहे.त्यामुळे त्याचे नाव ब्रह्मपुत्र आणि मॉस्कोवा नद्यांवरुन ब्रह्मोस असे ठेवण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र त्याच्या सुपरसॉनिक वेग आणि 800 किमी पल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
सिंदूर ऑपरेशनच्या मोठ्या यशानंतर भारतीय वायूसेना आणि नौसेने ब्रह्मोस मिसाईलची मोठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.नौसेने आपल्या वीर-श्रेणी ( Veer-class ) युद्धनौकांसाठी आणि वायू सेना सुखोई-30 MKI लढाऊ विमानांसाठी या मिसाईलचा वापर करणार आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या बातमीनुसार संरक्षण मंत्रालय लवकरच एक उच्च स्तरीय बैठकीत या मिसाईलच्या खरेदीला मंजूरी देऊ शकते. यामुळे भारताचे संरक्षण क्षमता आणखीन मजबूत होणार आहे.
ब्रह्मोस मिसाईल त्याच्या सुपरसॉनिक वेग ( मॅक 2.8) आणि अचूक लक्ष्यभेदासाठी ओळखली जाते. ही जमीन, समुद्र आणि हवेतून लाँच केली जाऊ शकते. आधी याची रेंज 290 किमी होती. त्यास अपग्रेड करुन आता 800 किमी करण्यात येणार आहे.
जागतिक स्तरावर भारतची ताकत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी शस्रास्रांची स्तूती केली होती. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जगाने भारताच्या स्वदेशी शस्रास्रांची क्षमता पाहीली आहे. आमची वायू संरक्षण प्रणाली, मिसाईल आणि ड्रोनने आत्मनिर्भर भारताची ताकद सिद्ध केली आहे. ब्रह्मोसला फिलीपाईन्स सारख्या देशाला निर्यात केले जात आहे. या क्षेपणास्राने ना केवळ भारताचे संरक्षण आणखी मजबूत केले आहे, तर क्षेत्रीय स्थिरतेतही योगदान दिले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल गेम चेंजर सिद्ध झाले आहे.भारताने जेव्हा या क्षेपणास्रांना सुखोई-30MKI आणि नौसेनेच्या प्लॅटफॉर्मवर वापर केला होता तेव्हा पाकिस्तान काही तासांत गुडघ्यावर आला होता. या मिसाईलने भारताने पाकिस्तानच्या सर्व एअर डिफेन्ससह रडार स्टेशन, अवॉक्स आणि एअर बेसना उद्धवस्त केले होते. यानंतर पाकस्तान बचावात्मक स्थितीत आला. या प्रकारे ब्रह्मोस मिसाईलनी पाकिस्तानी डिफेन्सला काही तासांत पंगू केले.