AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आता डोमिसाईलची गरज नाही, केंद्राचा मोठा निर्णय

Domicile Certificate : केंद्र सरकारने शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आता डोमिसाईलची गरज नाही, केंद्राचा मोठा निर्णय
domicile certificate newsImage Credit source: Google
| Updated on: Jun 25, 2026 | 9:14 PM
Share

सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहजपणे अर्ज करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिष्यवृत्ती प्रक्रिया अधिक सुलभ होणार

सरकारी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला सादर करणे बंधनकारक होते. या दाखल्यामध्ये विद्यार्थ्याच्या कायमस्वरूपी निवासस्थानाची माहिती असते, म्हणजे तो कोणत्या राज्याचा आणि कोणत्या भागाचा रहिवासी आहे हे स्पष्ट होते. मात्र, हा दाखला मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत होता. वेळेवर दाखला न मिळाल्याने अनेकदा अर्जाची मुदतही निघून जात असे. त्यामुळेच आता सरकारने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरापासून दूर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

आपल्या देशात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहतात. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी रहिवासी दाखला मिळवण्यासाठी पुन्हा आपल्या गावी जावे लागत होते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असे मात्र आता अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याने अशा विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार असून त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

पालकांनाही मिळणार दिलासा

रहिवासी दाखला मिळवण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही विविध धावपळ करावी लागत होती. रहिवासी दाखला मिळवण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये जावे लागत असे आणि काही वेळा काम लवकर करून घेण्यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागत होता. मात्र नव्या बदलामुळे अशा प्रकारच्या अडचणी आणि खर्चातून विद्यार्थी व पालकांची सुटका होणार आहे.

सरकारचा उद्देश काय?

सरकारच्या या निर्णयामागील मुख्य उद्देश शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करणे हा आहे. विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला मिळवण्यासाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये आणि पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीची मदत वेळेत पोहोचावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रियेला गती मिळेल आणि विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या धावपळीऐवजी आपल्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे, या निर्णयाचा फायदा देशातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक