AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुचंद्राच्या रात्री पती-पत्नीचा मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री वधू-वराचा एकत्र मृत्यू झाला आहे. नवविवाहित जोडपे नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांवर एकत्रच अंतिम संस्कारही करण्यात आले.

मधुचंद्राच्या रात्री पती-पत्नीचा मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का
| Updated on: Jun 06, 2023 | 4:50 PM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे अनेकांना लोकांना धक्का बसला आहे. लग्न झाल्यामुळे दोन परिवार आनंदात होते. लग्नात कोणतीही विघ्न नव्हते. सर्व काही सुरळीत झाले होते. मग मधुचंद्राच्या रात्री नवविवाहित दाम्पत्य खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचे मृतदेह दिसले. त्या दोघांचे मृतदेह हनिमूनच्या बेडवर पडलेले होते. या घटनेमुळे नवविवाहित दाम्पत्याच्या घरातील लग्नाच्या आनंदाचे शोकात रुपांतर झाले. मग दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय शास्त्रासाठी संशोधनाचा हा विषय बनला आहे.

कशामुळे झाला मृत्यू

बहराइच जिल्ह्यातील तेपरहानपुरवा गोधिया गावात राहणारा 22 वर्षीय प्रताप यादव याचा विवाह 20 वर्षीय पुष्पासोबत झाला होता. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी खोलीत मृतावस्थेत आढळलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला, हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. परंतु तरुण विवाहित जोडप्याचा एकाच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा होऊ शकतो? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

तज्ज्ञांनी सांगितले कारण

पुष्पा आणि प्रताप यांनी सकाळी दोघांची खोली उघडली नाही. अनेकदा ठोठावल्यानंतरही दोघांची खोली न उघडल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेथे दोघेही बेडवर मृतावस्थेत सापडले. वधू-वरांच्या मृत्यूमुळे घरातील लोकांना मोठा धक्का बसला. घरातील सदस्यांचे अश्रू थांबत नव्हते.

लग्नापूर्वीपासूनच ओळखत होते

प्रताप, पुष्पा दोघे एकमेकांना ओळखत होते. दोघेही लग्नामुळे आनंदी होते. या लग्नावर कुणाचाही आक्षेप नव्हता. रात्री उशिरापर्यंत नाच-गाणे सुरू होते. रात्री उशिरा सर्वांनी जेवण केले. १ जून रोजी हा विवाह सोहळा झाला होता.

पोलीस काय म्हणतात

पोलिस अधीक्षक प्रशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टम अहवालात पती-पत्नी दोघांनाही एकाच वेळी हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आहे. या जोडप्याला आधी हृदयविकाराचा त्रास नव्हता. या दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी दोन्ही मृतदेहांचे व्हिसेरा लखनौ येथील राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. दोघांच्याही अंगावर जखमेच्या खुणा नाही. यामुळे कोणत्याही प्रकाराच्या घातपाताची शक्यता नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.