जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा तेव्हा आव्हाने निर्माण होतात अन् संधीही, नरेंद्र मोदींचे थेट विधान..

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील IIT येथील दीक्षांत समारंभात सहभागी झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जग कसे बदल आहेत, हे सांगताना नरेंद्र मोदी दिसले. तुम्ही फक्त पदवी नाही तर स्वप्न घेऊन जात असल्याचे त्यांनी म्हटले.

जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा तेव्हा आव्हाने निर्माण होतात अन् संधीही, नरेंद्र मोदींचे थेट विधान..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Aug 08, 2026 | 12:29 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील IIT येथील दीक्षांत समारंभात सहभागी झाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोरील पुढील आव्हानावर भाष्य केले. परिवर्तन जो स्वीकारतो त्याचच विजय होतो, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. जो शिकेल तोच जिंकेल, असेही त्यांनी म्हटले. तुम्ही फक्त पदवी नाही तर स्वप्न घेऊन जात आहात. येथे आलेला पहिला दिवस आठवा, असेही नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना बोलताना म्हटले की, मित्रांनो, या भावूक क्षणी मी एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगेल, जेव्हा जेव्हा जीवन तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा ही कॅम्पस लाईफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमचं कुटुंब बनलं.

तुमचे प्रोफेसरने तुम्हाला आकार दिला. तुमचं हे कॅम्पस हळूहळू तुमचं घर बनलं. तुमच्या प्रत्येक यशात तुम्ही या सर्वांची आठवण कराल. या सर्वांबाबत कृतज्ञ व्हाल. या गोष्टी असेट म्हणून घेऊन जा. विसरून जाऊ नका. सोबत न्या.जाता जाता तुम्ही एकमेकांना भेटून जा हा माझा सल्ला असेल. कुठेही राहाल, तेव्हा प्रयत्न करा की हे नातं कायमचं राहील.

पुढे नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, जगात वेगाने बदल होत असताना तुम्ही या इन्स्टिट्यूटमधून जात आहात. जगातील स्टॅटेजिक इक्वेशन वेगाने बदलत आहे. ग्लोबल पॉवर बॅलन्सही प्रत्येकवेळी बदलत आहे. त्यामागे टेक्नॉलॉजीची स्पीड ही सर्वात मोठी फोर्स आहे. येत्या 20 ते 30 वर्षाचं जग कसं असेल हे सांगता येत नाही. पण जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा तेव्हा आव्हाने निर्माण होतात.

अन् संधीही मिळते. जग बदललेल, तंत्रज्ञानही बदलेल. या सर्वांमध्ये जो शिकेल तोच जिंकेल हे लक्षात ठेवा. जो नवीन आव्हानांचा नवा पर्याय काढण्याचं आव्हान ठेवेल. आव्हान ज्यांच्यासाठी संधी बनेल, तुम्ही हेच तर आयआयटी दिल्लीतून शिकला आहात. जाता जाता तुम्ही एकमेकांना भेटून जा हा माझा सल्ला असेल. कुठेही राहाल, तेव्हा प्रयत्न करा की हे नातं कायमचं राहील. जगात वेगाने बदल होत असताना तुम्ही या इन्स्टिट्यूटमधून जात आहात. जगातील स्टॅटेजिक इक्वेशन वेगाने बदलत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us