मृत्यूचा सापळा बनल्या Sleeper बसेस, कुठपर्यंत चालणार नियमांची ऐशी तैशी?

देशात लागोपाठ घडलेल्या स्लिपर बसेस दुर्घटनेत ४३ हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेकायदेशीर खाजगी स्लिपर बसेसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बसेसच्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कठोर नियम आणि त्याची अमलबजावणी करणे गरजेचे आहे.

मृत्यूचा सापळा बनल्या Sleeper बसेस, कुठपर्यंत चालणार नियमांची ऐशी तैशी?
| Updated on: Nov 10, 2025 | 7:56 PM

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बसला आग लगल्याने नुकताच २० लोकांची मृत्यू झाला. तसेच आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका स्लीपर बसला झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एका दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला आणि ही भीषण दुर्घटना घडली.राजस्थानच्या जैसलमेरच्या प्रकरणात तपासात या बसेसमध्ये फटाके ठेवण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. खाजगी ट्रॅव्हलच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सामानाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असते. यात अनेक सुरक्षाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. पर राज्यातून येणाऱ्या खाजगी बसेस तर अनेक नियम पायदळी तुडवत असतात असे उघडकीस आले आहे. राजस्थानचे जैसलमेर असो की आंध्रातील कुर्नूल असो दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० प्रवाशांची हकनाक बळी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या भयानक घटनेत प्रवाशांना वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.जैसलमेर घटनेची चौकशी झाली असता बसेसमध्ये फटाके देखील ठेवले होते असे उघडकीस आले आहे. त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा