‘Agneepath’ in Bihar : अग्निपथवरून बिहार सुन्न; कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा, पोलिसांवर गोळीबार, पोलिसांनीही झाडल्या 100 गोळ्या

| Updated on: Jun 18, 2022 | 4:00 PM

बेतियामध्ये आंदोलकांनी उपमुख्यमंत्री रेणू देवी तर भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावर हल्ला केला. येथे भाजप आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी सासाराम आणि मधेपुरा येथील भाजपच्या कार्यालयांना आग लावली.

Agneepath in Bihar : अग्निपथवरून बिहार सुन्न; कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा, पोलिसांवर गोळीबार, पोलिसांनीही झाडल्या 100 गोळ्या
रेल्वे
Image Credit source: tv9
Follow us on

‘Agneepath’ in Bihar :अग्निपथ‘वरून (Agneepath) बिहारमध्ये रेल्वेगाड्या जाळल्या जात आहेत. तर रस्त्यांवर तरूण उतरून हातात लाठ्या काठ्या घेऊन रस्ते चक्काजाम करत आहेत. तर केंद्र सरकारने ही योजना मागे घ्यावी म्हणत आहे. मागील तीन दिवसांपासून अग्निपथवरून बिहार (Bihar) धुमसंत आहे. तर अग्निपथवरून बिहारमध्ये चिघळत असेलेल्या परिस्थितीवरून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेकडून निर्णय घेतला असून आजपासून 20 जूनपर्यंत रेल्वे गाड्या (Railways) या रात्रीच धावतील असे सांगण्यात आले आहे. तर बिहारमधील पूर्व मध्य रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या गाड्या या रात्री 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत धावणार आहे. बिहारमध्ये चौथ्या दिवशीही अग्निपथवरून निदर्शने सुरूच होती. पाटणाच्या मसौरी येथील तारागेना स्टेशनजवळ दगडफेक आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. तर आंदोलकांनी स्थानकाची तोडफोड सुरू केल्याचेही उघड झाले आहे. तसेच पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने आंदोलकांनी पेटवून दिली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अनेक वेळा गोळीबार केला.

पोलिस ठाण्यावर हल्ला

मसौधी येथे सकाळी 8 वाजता कोचिंगमधून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थी स्टेशनवर जमा होऊ लागले. विद्यार्थ्यांनी तोडफोड सुरू केली. स्टेशन मास्तरांची केबिन आणि बुकिंग काउंटर पेटवून देण्यात आला. वाहनांचीही तोडफोड देखील करण्यात आली. यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर 10-15 राऊंड गोळीबार करण्यात आला. बचावासाठी पोलिसांनीही 100 हून अधिक गोळ्या झाडल्या आहेत.

31 एफआयआर, 435 आंदोलकांना अटक

बक्सरच्या नवानगरमध्ये NH-120 वर आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिस निरीक्षकांची गाडी पेटवून देण्यात आली. बचावासाठी पोलिसांनी दोन-चार राउंड फायर केले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान बिहारमधील चिघळत चालेली स्थिती पाहता तेथील 15 जिल्ह्यांमध्ये 19 जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा बंद होत्या. मात्र बिहार बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. जेहानाबादच्या तेहता मार्केटमध्ये सकाळी 7.30 वाजता आंदोलकांनी दगडफेकीनंतर ट्रक पेटवून दिला. मुंगेरमध्ये आंदोलकांनी गोंधळ घातला. तारापूर बीडीओच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण 31 एफआयआर नोंदवण्यात आले असून 435 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

राज्यातील वाढती आंदोलने लक्षात घेता, संध्याकाळी उशिरा सरकारने कैमूर, भोजपूर, औरंगाबाद, रोहतास, बक्सर, नवादा, पश्चिम चंपारण, समस्तीपूर, लखीसराय, बेगुसराय, वैशाली, मुझफ्फरपूर येथे सोशल नेटवर्किंग साइट्स आणि संदेश सेवा बंद केल्या आहेत. मोतिहारी, दरभंगा आणि सारण. दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश.

पोलिस ठाण्यावर हल्ला

औरंगाबादच्या गोह ब्लॉकमध्ये पोलिस ठाण्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. ज्यामध्ये तीन ते चार पोलीस जखमी झाले. बसेसचीही तोडफोड करण्यात आली. तसेच ब्लॉक कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी डझनहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दौदनगर-पाटणा रोडवर बसवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर बस परत आली. रफीगंजमध्येही आंदोलकांनी बाजारात घुसून गोंधळ घातला. मात्र, तत्काळ पोलिस आले. त्यानंतर आंदोलक पळून गेले.

तीन दिवसांपासून राजधानी पाटणासह 25 जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी गोंधळ घातला होता. दानापूर आणि लखीसराय स्थानकांसह अर्धा डझनहून अधिक स्थानकांवर जाळपोळ करण्यात आली. 10 गाड्या पेटवण्यात आल्या.

अशा लोकांना भविष्यात लाभ मिळणार नाही

शुक्रवारी, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था संजय सिंह यांनी सांगितले की, राज्यात एकूण 31 एफआयआर नोंदवण्यात आले आणि गुरुवारी हिंसक उपद्रव आणि सरकारी मालमत्तेची नुकसान केल्याप्रकरणी 435 जणांना अटक करण्यात आली.

यामध्ये गुरुवारी झालेल्या गोंधळात 24 एफआयआर आणि 125 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आज झालेल्या नुकसानीप्रकरणी कायदेशीर कारवाईही केली जाईल. व्हिडिओ फुटेज आणि फोटोंच्या आधारे दंगलखोरांना अटक केली जाईल. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. भविष्यात अशा लोकांना कोणताही लाभ मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

लाखिसराईत एकाचा मृत्यू

यापूर्वी लखीसराय येथील जनसेवा एक्स्प्रेसमध्ये झालेल्या जाळपोळीत एका 25 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला होता. ठिकठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजप अध्यक्षांच्या घरावर हल्ला

बेतियामध्ये आंदोलकांनी उपमुख्यमंत्री रेणू देवी तर भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावर हल्ला केला. येथे भाजप आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी सासाराम आणि मधेपुरा येथील भाजपच्या कार्यालयांना आग लावली. एक दिवसापूर्वी नवाडा येथील भाजपचे कार्यालय देखील जाळण्यात आले होते. दरम्यान दोन आमदारांवर हल्ला करण्यात आला होता.