पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसच्या उमेदवाराला अटक, ममता बॅनर्जींनी दिला होता पाठिंबा

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या उमेदवाराला अटक केली आहे. काही तासांपूर्वीच ममता बॅनर्जींनी पाठिंबा दिला होता.

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसच्या उमेदवाराला अटक, ममता बॅनर्जींनी दिला होता पाठिंबा
West bengal news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 7:36 PM

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोडी घडू लागल्या आहेत. ममता यांच्या पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यानंतर काही वेळातच पश्चिम बंगाल पोलिसांनी काँग्रेसच्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. एका जुन्या प्रकरणात काँग्रेसला उमेदनवाराला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील या घडामोडीची संपूर्ण देशात चर्चा होऊ लागली आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गटातील संचिता प्रधान डे या यांनी शुक्रवारी शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा दिला होता. या निर्णयावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. संचिता प्रधान डे या पेशाने शिक्षिका आहेत.

संचिता यांनी शुक्रवारी पतीसोबत मुख्यमंत्री अधिकारी यांच्याशी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी अर्ज मागे का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अर्ज मागे घेतल्याने ममता यांच्या पक्षाचा नंदीग्राममध्ये एकही उमेदवार राहिला नाही. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जी यांनी निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मित्रपक्ष काँग्रेसला पाठिंबा दर्शवला. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवत इंडिया आघाडी मजबूत करण्याचा निश्चय केला. परंतु आता काँग्रेसच्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जींची आयोगावर टीका 

तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचं चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याची टीका केली. आयोगाने दिलेले नाव आणि चिन्ह अंतिम असल्याचे मानत नाही. खरंतर निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवार आणि निवडणूक चिन्ह अंतिम झाले होते. त्यानंतर शेवटच्या काही दिवसांत निर्णय घेण्यात आला आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आयोगावर टीका केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us