AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे स्टेशनच्या नावाची पाटी ही नेहमी पिवळीच का असते? 99 टक्के लोकांना माहिती नसणार खरं कारण

तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनवर गेलात की, तुम्हाला तिथे त्या स्टेशनच्या नावाची पाटी दिसते, ही पाटी नेहमी पिवळ्या रंगामध्ये असते. त्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

रेल्वे स्टेशनच्या नावाची पाटी ही नेहमी पिवळीच का असते? 99 टक्के लोकांना माहिती नसणार खरं कारण
Railway StationImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 8:17 PM
Share

तुम्ही जेव्हा कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमची नजर तिथे कशावर पडते? प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे स्टेशनच्या नावाचा एक बोर्ड लिहिलेला असतो, सर्वात आधी आपली नजर त्या नावावर पडते. तुम्ही कोणत्याही स्टेशनवर जा, तिथे त्या स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, तो नेहमी पिवळ्याच रंगाचा असतो. त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या रेल्वे स्टेशनचं नावं लिहिलेलं असतं. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळाच का असतो? काळा, हिरवा, लाल किंवा इतर रंगाचा हा बोर्ड का नसतो? रेल्वे स्टेशनचं नाव हे नेहमी पिवळ्याच बोर्डवर लिहिलं जातं, यामागे केवळ परंपरा नाहीये, तर त्यामागे अनेक कारणं देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कारणांबाबत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी

पिवळा रंग हा दुरून लवकर आणि स्पष्ट दिसतो. कडाक्याचं ऊन असो, धुकं असो किंवा रात्र असो. अशा प्रत्यक स्थितीमध्ये पिवळा कलर हा दुरून सहज आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मवरून भरधाव वेगात जात असते, तेव्हा देखील या पिवळ्या रंगाच्या बोर्डमुळे आपण त्या स्टेशनचं नाव सहज वाचू शकतो, आणि पुढे कोणतं स्टेशन येणार आहे, याचा अंदाज आपल्याला येतो. पिवळ्या पाटीवर काळी अक्षर अधिक ठळकपणे दिसतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेस्टेशनचे बोर्ड हे नेहमी पिवळेच असतात, आणि त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या -त्या स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं.

भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात धुकं पडतं, अशा स्थितीमध्ये जर दुसऱ्या कोणत्याही रंगाचा रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड असेल तर तो सहजपणे आपल्याला वाचता येणार नाही, मात्र रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळा असल्यामुळे तो सहज वाचता येतो. रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा या बोर्डवर लाईटचा प्रकाश पडतो, तेव्हा तो तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसतो, मात्र त्याऐवजी एखाद्या दुसऱ्या रंगाचा बोर्ड असेल तर तो तुम्हाला स्पष्ट दिसेलच याची खात्री नसते, त्यामुळे रेल्वेचा बोर्ड हा नेहमी पिवळ्या रंगाचाच असतो. तसेच रेल्वेच्या चालकांना देखील ट्रेन चालवत असताना बोर्ड स्पष्टपणे दिसणं गरजेच असतं, त्यासाठी देखील नेहमी रेल्वे स्टेशनच्या बोर्डाला पिवळाच कलर दिला जातो.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं