Ujjani Dam : उजनी धरणात 34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, आजपासून शेतीला मिळणार भरपूर पाणी

| Updated on: Apr 05, 2022 | 3:09 PM

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

1 / 5
उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध  आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे  करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान  मिळणार आहे.

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

2 / 5
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच  वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

3 / 5
 पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

4 / 5
सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

5 / 5
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन  सोडले जाणार असल्याचे   जलसंपदा विभागाकडून  सांगण्यात जरी आले असले तरी आज  दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात जरी आले असले तरी आज दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय