67 दिवस , 1850 कि.मी. अंतर अरबी समुद्र ते बंगालचा उपसागरचा पायीप्रवास 25 शीच्या आशुतोषच्या ध्येयवेडेपणाची गोष्ट

या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक दिवसाचे अनुभव त्याने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत. या प्रवासात विविध ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 18, 2022 | 9:21 PM
1 / 6
कोकणातील नरवन  गावाचा  आशुतोष अजित  जोशी  या  25  वर्षीय  युवकाची  ही गोष्ट. इंग्लडमध्ये  उच्च शिक्षण  घेतल्यानंतर  उच्च पगाराची नोकरी न करता भारतात परतण्याचे त्याने  ठरवले. अन तो आला ही परत भारतात.

कोकणातील नरवन गावाचा आशुतोष अजित जोशी या 25 वर्षीय युवकाची ही गोष्ट. इंग्लडमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर उच्च पगाराची नोकरी न करता भारतात परतण्याचे त्याने ठरवले. अन तो आला ही परत भारतात.

2 / 6

इथे येऊन त्यानं ठरवल्याप्रमाणे त्याने भारतातील पाणीप्रश्न व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वृक्ष संवर्धन या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी त्याने तब्बल नरवन ते जगन्नाथपुरी असा 1850 किमीचा पायीप्रवास नुकताच पूर्ण केला आहे.

3 / 6

कोकणातील नरवन येथील असलेला आशितोषने इंग्लडमधील ग्लॅस्टर विद्यापीठात बी ए फायनान्सचे शिक्षण 2021 मध्ये पूर्ण केले आहे.

4 / 6

आशुतोषने या संपूर्ण प्रवासात पाणीटंचाई , शेतकरी आत्महत्या , जलसाठ्याचे फोटो, व्हिडीओ , गावकऱ्यांशी, युवकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

5 / 6

या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक दिवसाचे अनुभव त्याने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत. या प्रवासात विविध ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

6 / 6

आशुतोष ने अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर ही १८५० कि.मी.ची यात्रा एकूण ६७दिवसात पूर्ण केली आहे. यासंपूर्ण प्रवासातील अनुभवकथन त्याने यात्रा पूर्ण झाल्यानंतर आपल्या फसेबुक लाईव्हमधून मांडली आहे. (सर्व फोटो आशुतोषच्या इन्स्ट्राग्रामवरून साभार )

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us