
मोहाडी शहरात 2-3 दिवसाआड पाणी मिळत असल्याने मोहाड़ित भीषण जलसंकट बळावले आहे. मोहाडी नगर पंचायतीच्या नियोजनाचा चुकीच्या कारभारामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच नागरिकांची भटकंती वाढली आहे.

सध्या उन्हाळ्याची फक्त चाहूल लागलेली आहे. कडक उन्हाळा यायला अजून एक महिना बाकी असताना मोहाडी शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे

मोहाडित अनेक वर्षापासून ग्रामपंचायत असताना सुध्दा पाणी टंचाई समस्या उद्भवली आहे.

सहा वर्षापूर्वी ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले, तरी समस्या तशी ची तशीच आहे. येथील पाणीपरवठा योजना 45 वर्षे जूनी असल्याने ती पूर्णपणे निकामी झाली आहे

पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने टाकी लवकर भरत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्भवलेली समस्या लक्षात घेता नगर पंचायत प्रशासनाला रोषाला सामोर जावे लागत आहे.