Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन

Bride : आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असलेल्या लग्नाच्या दिवशीही शिक्षणाची कास न सोडता परीक्षेला उपस्थित राहून वैष्णवी काळे हिने जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 9:18 PM
1 / 5
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील चि. सौ. का. वैष्णवी संतोष काळे हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता येथीलच चि. ज्ञानेश्वर राजू चौधरी यांच्याशी आनंदात संपन्न झाला.

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील चि. सौ. का. वैष्णवी संतोष काळे हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता येथीलच चि. ज्ञानेश्वर राजू चौधरी यांच्याशी आनंदात संपन्न झाला.

2 / 5
साधारण परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबांनी सोहळा पार पाडत असतानाच वैष्णवीसमोर मोठे आव्हान उभे होते. ती रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू (BSW) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचा महत्त्वाचा पेपर हाच दिवशी दुपारी 2 वाजता वाशिम येथील राजस्थान कॉलेज येथे नियोजित होता.

साधारण परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबांनी सोहळा पार पाडत असतानाच वैष्णवीसमोर मोठे आव्हान उभे होते. ती रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू (BSW) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचा महत्त्वाचा पेपर हाच दिवशी दुपारी 2 वाजता वाशिम येथील राजस्थान कॉलेज येथे नियोजित होता.

3 / 5
लग्न आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने कोणालाही गोंधळ उडाला असता मात्र वैष्णवीने शिक्षणाला प्राधान्य देत लग्नसोहळा आटोपताच वेळ न दवडता थेट परीक्षा केंद्र गाठले आणि आपला पेपर पूर्ण केला. तिच्या या निर्णयामुळे उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक भारावून गेले होते.

लग्न आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने कोणालाही गोंधळ उडाला असता मात्र वैष्णवीने शिक्षणाला प्राधान्य देत लग्नसोहळा आटोपताच वेळ न दवडता थेट परीक्षा केंद्र गाठले आणि आपला पेपर पूर्ण केला. तिच्या या निर्णयामुळे उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक भारावून गेले होते.

4 / 5
माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षमय कार्यातून प्रेरणा घेत वैष्णवीने हा धाडसी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तिच्या या कृतीमुळे परिस्थिती कोणतीही असो, शिक्षणाची वाट कधीही सोडू नये हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला आहे.

माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षमय कार्यातून प्रेरणा घेत वैष्णवीने हा धाडसी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तिच्या या कृतीमुळे परिस्थिती कोणतीही असो, शिक्षणाची वाट कधीही सोडू नये हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला आहे.

5 / 5
वैष्णवीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर मुलींनीही शिक्षणाला प्राधान्य देत स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा प्रेरणादायी संदेश या घटनेतून मिळत आहे.

वैष्णवीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर मुलींनीही शिक्षणाला प्राधान्य देत स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा प्रेरणादायी संदेश या घटनेतून मिळत आहे.

Follow Us