अनोख्या विवाहाची चर्चा, घोड्यावरुन नवरदेवाची नव्हे तर नवरीचा काढली मिरवणूक, कारण काय?

देशात बॉलीवूडमधील लग्नांची चर्चा होत असते. उद्योगपतींच्या मुलांचे होणारे भव्य विवाह समारंभ चर्चेत असतात. राजकारणातील नेत्यांच्या मुलांच्या समारंभाला येणाऱ्या व्हिव्हिआयपीमुळे त्याची चर्चा रंगलेली असते. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील विवाहाची चर्चा सध्या रंगली आहे.

Jitendra Zavar | Updated on: Jul 04, 2024 | 11:51 AM
1 / 5
लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात.

लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात.

2 / 5
बुलडाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी ही परंपरा मोडली आहे. त्यांनी त्यांची मुलगी नववधू निकिता हिची विवाह वेगळ्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे त्या विवाहाची चर्चा परिसरात रंगली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी ही परंपरा मोडली आहे. त्यांनी त्यांची मुलगी नववधू निकिता हिची विवाह वेगळ्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे त्या विवाहाची चर्चा परिसरात रंगली आहे.

3 / 5
संजय जाधव यांनी नवरीची गावातून घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मुलगा, मुलगी एक समान असते, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी नवरीची घोड्यावरुन थाटात मिरवणूक गावातून काढली.

संजय जाधव यांनी नवरीची गावातून घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मुलगा, मुलगी एक समान असते, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी नवरीची घोड्यावरुन थाटात मिरवणूक गावातून काढली.

4 / 5
निकिता हिचा विवाह नुकताच दिवठाणा येथील धनंजय मोरे यांच्याशी थाटामाटात पार पडला. विवाहापूर्वी सकाळी वधू निकिताची घोड्यावरून गावातून डीजेच्या तालावर फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती.

निकिता हिचा विवाह नुकताच दिवठाणा येथील धनंजय मोरे यांच्याशी थाटामाटात पार पडला. विवाहापूर्वी सकाळी वधू निकिताची घोड्यावरून गावातून डीजेच्या तालावर फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती.

5 / 5
जाधव  परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश ही यातून देत दिला आहे. शेतकरी कुटुंबाने केलेल्या या निर्णयाचे कौतूकही होत आहे.

जाधव परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश ही यातून देत दिला आहे. शेतकरी कुटुंबाने केलेल्या या निर्णयाचे कौतूकही होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us