
मात्र याठिकाणी मोठमोठी झाडे तोडली जात आहेत, वनविभागाचे अधिकारी अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करणार का , हे पाहणे आता गरजेचे आहे.

एकीकडे तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असून दुसरीकडे विभागाच्या वतीने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत दिल्या जातोय, तर शासन एकीकडे वृक्षारोपणासाठी मोहीम राबवत असून त्यासाठी शासनाच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपये यावर खर्च केले जातात

अनेकवेळा वनविभागाचे अधिकारी या रस्त्याने ये-जा करत असतात , मात्र या अवैध वृक्षांची कत्तल केलेल्या लाकडांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न निर्माण होतो

नांदुरा ते बुलढाणा या रोडवर रस्त्याच्या बाजूलाच झाडांची अवैध कत्तल करून ठिकठिकाणी लाकडांचे ढीगार पडलेले आहेत

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन याकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येत आहे.